AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शब्द दिला की पाळणारच, अत्यंत निष्ठावान असतात या 4 राशी, जीवनसाथीच्या शोधात असाल तर यांचा नक्की विचार करा

राशीचक्रातील 12 राशींचा स्वभाव परस्परांपासून खूपच भिन्न आहे. या राशींपैकी 4 राशी लग्नासाठी नेहमीच तयार असतात. या राशींसाठी लग्न म्हणजे सर्वस्व असते.

शब्द दिला की पाळणारच, अत्यंत निष्ठावान असतात या 4 राशी, जीवनसाथीच्या शोधात असाल तर यांचा नक्की विचार करा
Zodiac-Signs-1
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 9:39 AM
Share

मुंबई : लग्न भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा आहे. दोन व्यक्ती पवित्र अग्नीच्या साक्षीने संपूर्ण आयुष्य एकत्र व्यतीत करण्यासाठी तयार होतात. भारतातील या परंपरेला आता पश्चिमात्य लोक देखील आत्मसाद करु लागले आहेत. पण जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, त्यामुळेच काही लोकांना लग्न म्हणजे बंधन वाटते. तर काहींना संपूर्ण आयुष्य बदलवणारी घटना. राशीचक्रातील 12 राशींचा स्वभाव परस्परांपासून खूपच भिन्न आहे. या राशींपैकी 4 राशी लग्नासाठी नेहमीच तयार असतात. या राशींसाठी लग्न म्हणजे सर्वस्व असते. एखाद्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याची भावना या राशींच्या व्यक्तींमध्ये असते. या राशी वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाहीत.

1. वृषभ

या राशीच्या लोकांना आयुष्यात स्थिरता महत्त्वाची असते. सुरक्षितेची भावना महत्त्वाची असते यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे लग्न. एकदा त्यांना योग्य व्यक्ती भेटला तर ते मागे हटत नाहीत. या राशीच्या व्यक्तींनी एकदा निर्णय घेतला तर ह्या व्यक्ती ते काम पूर्ण करतात. हे लोक अतिशय निष्ठावान असतात.

2. कर्क

कर्क राशीचे लोक कुटुंबाभिमुख असतात, त्यांना त्यांच्या कुटुंबापुढे काहीही दिसत नाही. या राशीच्या व्यक्तींना जीवनातील सर्व चढ उतारांमध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहणारा जोडीदार हवा असतो. त्यांच्या जोडीदारावर ते प्रचंड प्रेम करतात.

3. तुळ

या राशीचे लोक वास्तववादीपेक्षा आदर्शवादी असतात. लग्न होण्याच्या संकल्पनेनेच ते आनंदी होतात. याशिवाय त्याला प्रेमाची कल्पनाही आवडते. या राशीच्या व्यक्तीला एका प्रमाणिक जोडीदाराची गरज असते. जर त्यांना असे जोडीदार मिळाला तर ते लोक त्यांच्या सोबत वचनबद्ध राहतात.

4. वृश्चिक

या राशीचे लोक निष्ठावान असतात. त्यांना नातेसंबंधात प्रेम आणि बांधिलकीने परिपूर्ण असलेल्या एखाद्या व्यक्तीशी संबंध ठेवण्याची कल्पना त्यांना आवडते. त्यांना लग्न करण्याची कधीच घाई नसते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या :

Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.