AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय

आपलं सगळं सुरळीत सुरू असताना अचानक आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी घडत नाहीत, घरात कारण नसताना वादविवाद होतात. त्यावर वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 05, 2026 | 9:37 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या सभोवती जसं वातावरण असतं तसा त्याचा प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. जर तुमच्या भोवती सतत नकारात्मक वातावरण असेल तर त्याचा तुमच्यावर देखील नकारात्मकच प्रभाव पडतो. जर सकारात्मक वातावरण असेल तर निश्चितच त्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडणार. मात्र तरी देखील अनेकदा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की आपल्याला नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो, या संकटातून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्हाला एखाद्याची नजर लागते, तेव्हा त्याचा फटका तुम्हाला बसतो. तुम्हाला अपेक्षित असलेली कामे घडून येत नाहीत. ऑफिसमध्ये कामात मन लागत नाही, अचानक आर्थिक नुकसान होतं, कारण नसताना वाद होतात, त्यावर देखील वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

नजर लागते म्हणजे नेमकं काय होतं?

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या जवळची किंवा परिचयामधील व्यक्ती जेव्हा तुमची प्रगती पाहून तुमचा मत्सर करते, जेव्हा ती व्यक्ती तुमच्याबद्दल सतत वाईट चिंतित राहते, तेव्हा त्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम हा तुमच्यावर होण्यास सुरुवात होते. यामुळे होत काय की तुम्हाला जी अपेक्षित कामं आहेत, ती पूर्ण होत नाहीत, अचानक आर्थिक नुकसान होऊ शकतं, कामात लक्ष लागत नाही. इतरही अनेक प्रकारे याचा तुम्हाला फटका बसू शकतो.

उपाय

वास्तुशास्त्रामध्ये यावर एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला कोणाची नजर लागली आहे, तर अशावेळी एका छोट्या डबीमध्ये मीठ भरून ते तुमच्या कामाच्या ठिकाणी ड्रॉवरमध्ये ठेवून द्या. तसेच दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्या तळहातावर थोडसं मीठ घ्या, ते दोन्ही तळहाताला व्यवस्थित चोळा आणि नंतर आपले हात धुवा यामुळे नजरदोष दूर होऊन, सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होईल, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.