AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण होणार्‍या विविध वास्तुदोषांवर उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार महिलांनी आपल्या लग्नानंतर काही गोष्टी करणं हे अशुभ मानलं जातं. त्याच गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 01, 2026 | 8:18 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुम्हाला विविध प्रकारच्या समस्या जाणवू लागतात. जसं की अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, किवा काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं होतात. यावर वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं होतात. जर पती-पत्नीचं पटत नसेल, दररोज भांडणं होत असतील तर भविष्यात परिस्थिती गंभीर बनू शकते. त्याचा परिणाम हा आपल्या मुलांवर देखील होतो. तर असं का होतं? यामागे नेमकं काय कारण असू शकतं? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तुशास्त्रानुसार जर शुक्रदोष निर्माण झाला तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. शुक्रदोष नाहीसा करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

शुक्रदोष कधी निर्माण होतो?

वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा सौंदर्याचा कारक ग्रह आहे. जेव्ह लग्न झालेल्या महिला आपली कोणतीही वस्तू जसं की लग्नाची अंगठी, किंवा आपली एखादी साडी, पायातील जोडवे अशा गोष्टी इतरांसबोत शेअर करतात, तेव्हा घरात शुक्रदोष निर्माण होतो. जेव्हा तुम्ही आपल्या वस्तू इतरांना देतात तेव्हा तुमच्या कुंडलीमधील शुक्र ग्रह हा कमजोर होतो. शुक्र ग्रह कमजोर झाल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लग्न झालेल्या महिलांनी कधीही आपल्या वस्तू इतरांना देऊ नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

शुक्रदोषामुळे काय अडचणी येतात?

जर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमजोर असेल तर काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत राहतात. घर सतत अशांत असतं. ज्या घरात सतत भांडणं होतात, त्या घरात कधीही पैसा टिकत नाही. घरातील बरकत चालली जाते. एवढंच नाही तर त्याचा परिणाम हा तुमच्या कामावर देखील होतो. जर घरात लहान मुलं असतील तर अशा भांडणांमुळे त्यांच्या मानसिक विकासामध्ये बाधा निर्माण होते. अचानक काही मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

काय उपाय करावेत?

घरात शुक्रदोष निर्माण होऊ नये यासाठी विवाहित महिलांनीच नाही तर कोणत्याही व्यक्तीने आपल्या वैयक्तिक गोष्टी जसं की रुमाल, दागिने किंवा इतर गोष्टी दुसऱ्याला वापरायला देऊ नयेत, कारण त्यामुळे शुक्रदोष निर्माण होतो. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला आपल्या वैयक्तिक गोष्टी वापरण्यास दिल्या तर त्याच्या आयुष्यात काही समस्या असतील तर त्याचा परिणाम हा तुमच्यावर देखील होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्या वैयक्तिक गोष्टी शक्यतो इतरांना देणं टाळावं हा शुक्रदोषावरील उपाय आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.