AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातातून या वस्तूंचे पडणे मानले जाते अशुभ, देते आर्थिक संकटाचा इशारा

शास्त्रानुसार हातातून काही वस्तू पडणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की या गोष्टी व्यक्तीच्या आगामी वाईट काळाकडे निर्देश करतात. तुमच्या हातूनही अशी काही वस्तू पडली तर लगेच सावध व्हा.

हातातून या वस्तूंचे पडणे मानले जाते अशुभ, देते आर्थिक संकटाचा इशारा
अपशकुनImage Credit source: Social Media
| Updated on: May 15, 2023 | 9:33 PM
Share

मुंबई : अनेकदा आपण घाईत असतो आणि वस्तू आपल्या हातातून निसटून पडतात. ही गोष्ट अगदी सामान्य असली तरी वास्तुशास्त्रात ती अशुभ मानली जाते. हातातून वस्तू पडणे हे येऊ घातलेल्या संकटाचे लक्षण आहे असे म्हणतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. ज्योतिष शास्त्रानुसार या गोष्टी हातातून पडणे हे अशुभ लक्षण आहे, ते तुम्हाला अचानक येणा-या संकटांचा इशारा देत आहेत. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचे पडणे वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) अशुभ मानले जाते.

मीठ

आपल्या जीवनात मीठ खूप महत्वाचे आहे. मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच केला जात नाही, तर त्याचा नशिबाशीही खोलवर संबंध आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्र या ग्रहांचे प्रतिनिधी मानले जाते. म्हणूनच असं म्हणतात की हातातून मीठ पडलं तर ते अशुभ लक्षण आहे. म्हणजे आयुष्यात संकटे येणार आहेत.

दूध

दूध हा चंद्राचा कारक आहे. गॅसवर ठेवलेले दूध उकळले आणि सांडले किंवा दुधाचा ग्लास हातातून पडला तर ते चांगले मानले जात नाही. असे म्हटले जाते की दुधाची गळती आर्थिक संकट दर्शवते.

काळी मिरी

काळी मिरी हातातून पडणे हे अशुभ लक्षण मानले जाते. हातातून काळी मिरी पडली आणि विखुरली तर नात्यात दुरावा येतो, असं म्हणतात. हातातून काळी मिरी पडल्याने नकारात्मकता वाढते.

तृणधान्ये

अन्न खाताना किंवा वाढतांना धान्य पडणे अशुभ आहे असे म्हणतात. जेवतांना हातातून अन्नपदार्थ पडल्यास अन्नपूर्णा देवी माता लक्ष्मीचा अपमान होतो. हे घरातील गरिबी दर्शवते.

तेल

वास्तुशास्त्रात तेल सांडणे हे अशुभ लक्षण आहे. तेल हे शनिदेवाचे प्रतिक आहे असे म्हणतात. त्यामुळे हातातून तेल वारंवार पडणे हे धनहानी होण्याचे लक्षण आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.