Marriage On Akshaya Tritiya 2021 | विवाहासाठी का अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस? जाणून घ्या

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी नवीन काम सुरु (Marriage On Akshaya Tritiya 2021) करण्यासाठी पंचांग पहाण्याची गरज नसते. तृतीयेला कोणतेही शुभ कार्य कधीही केले जाऊ शकते.

Marriage On Akshaya Tritiya 2021 | विवाहासाठी का अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस? जाणून घ्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 11:47 AM

मुंबई : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी नवीन काम सुरु (Akshaya Tritiya) करण्यासाठी पंचांग पहाण्याची गरज नसते. तृतीयेला कोणतेही शुभ कार्य कधीही केले जाऊ शकते. हा दिवस लग्नासाठीही खूप शुभ मानला जातो. देवोत्थान एकादशी प्रमाणे या दिवशी अबूझ शुभ मुहूर्त असतो. या दिवशी लग्नासाठी कोणत्याही पंडितच्या सल्ल्याची गरज नाही (Why Akshaya Tritiya Is The Best Shubh Muhurat For Marriage).

लग्नसुद्धा एक शुभ कार्य आहे म्हणूनच, बरेच लोक विशेषत: अक्षय्य तृतीयेच्या तिथीला आपल्या मुलांचे लग्न करण्याची प्रतीक्षा करतात. अनेकांची अशी मान्यता आहे की या दिवशी लग्न लावल्याने मुलांचे वैवाहिक जीवन आनंद आणि समृद्धीने भरलेले असेल. याशिवाय, लग्नाच्या वेळी कन्या दान एक महत्वाचा विधी आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कन्या दान केल्यास त्याचे पुण्य अनेक पटीने वाढते. अक्षय्य तृतीयेचा दिवस लग्नासाठी इतका शुभ का मानला जातो ते जाणून घेऊया.

म्हणून हा दिवस शुभ आहे

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरु झाले असा सर्व अभ्यासकांची मान्यता आहे. द्वापार युगाचा शेवट आणि कलियुगाचा प्रारंभ या दिवसापासूनदेखील मानला जातो. अक्षय तृतीया याला युगादी तिथी म्हणून देखील ओळखले जाते, कारण ते युगांची सुरुवात आणि शेवटची तारीख आहे.

स्वत: भगवान श्रीकृष्णाने या दिवसाचे महत्त्व सांगितले

पौराणिक कथांनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महाभारतची लढाई संपली होती. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरांना सांगितले की, या दिवशी जे काही सर्जनशील किंवा सांसारिक कार्य केले जातील, त्याचं पुण्य मिळेल आणि त्यामध्ये कोणतीही नवीन कामे किंवा व्यवसाय प्रसिद्धी आणि कीर्ती प्राप्त करतील.

सुदामा आणि श्री कृष्णाला भेट

अक्षय्य तृतीयेबद्दल अशीही एक मान्यता आहे की, भगवान कृष्णाचे परम मित्र सुदामा या दिवशी द्वारका येथे पोहोचले होते आणि त्यांनी देवाची भेट घेतली होती आणि त्यांना काही तांदुळ अर्पण केले होते. ज्याला प्रेमभावनेने ग्रहण केल्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचे दारिद्र्य दूर केले आणि त्याच्या झोपडीला राजवाडा आणि गावाला सुदामा शहर बनवले. त्या दिवसापासून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दानाचे महत्त्व वाढले.

वेद व्यासांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली

मान्यता आहे की, अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर महर्षि वेद व्यासजी यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये गीता देखील आहे. या दिवशी गीतेचा 18 वा अध्यायाचे पठण करणे शुभ मानले जाते.

Why Akshaya Tritiya Is The Best Shubh Muhurat For Marriage

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Akshaya Tritiya 2021 | जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचं महत्व आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त

Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला दान का करावे?, जाणून घ्या ही पौराणिक कथा

Akshaya Tritiya 2021 : अक्षय्य तृतीयेला ‘या’ शुभ गोष्टी खरेदी करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.