हिंदू धर्मात घंटीला का आहे विशेष महत्त्व? 99 टक्के लोकांना नाही माहिती हे कारण

हिंदू धर्माच्या मान्यतेनूसार, ध्वनीपासून प्रकाश निर्माण होतो आणि प्रकाशाच्या बिंदूपासून ध्वनी निर्माण होतो. त्यामुळे मंदिरात किंवा पूजागृहात घंटा स्वरूपात ध्वनी ठेवला जातो. असे म्हणतात की पूजेच्या वेळी घंटा वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा आणि सर्व प्रकारचे वास्तु दोष दूर होतात

हिंदू धर्मात घंटीला का आहे विशेष महत्त्व? 99 टक्के लोकांना नाही माहिती हे कारण
हिंदू घर्मात घंटीचे महत्त्वImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 3:15 PM

मुंबई : मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि विशिष्ट ठिकाणी घंटा लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. त्याचबरोबर घरातील पूजेच्या ठिकाणी गरुड घंटा देखील ठेवली जाते. धार्मिक शास्त्रानुसार विश्वाच्या निर्मितीमध्ये ध्वनीचे विशेष योगदान राहिले आहे. विश्वाची निर्मिती झाली तेव्हा जो ध्वनी निर्माण झाला, तोच आवाज या घंटातून (Ghanta Importance) निघतो, असे मानले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनूसार, ध्वनीपासून प्रकाश निर्माण होतो आणि प्रकाशाच्या बिंदूपासून ध्वनी निर्माण होतो. त्यामुळे मंदिरात किंवा पूजागृहात घंटा स्वरूपात ध्वनी ठेवला जातो. असे म्हणतात की पूजेच्या वेळी घंटा वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा आणि सर्व प्रकारचे वास्तु दोष दूर होतात आणि सुख-समृद्धी वाढते. चला जाणून घेऊया  घंटा किंवा घंटा नाद इतका महत्त्वाचा का आहे? आणि त्याचे काय फायदे आहेत.  बाजारात अनेक प्रकारच्या घंटा उपलब्ध असल्या तरी भगवान विष्णूच्या दैनंदिन पूजेमध्ये आपण फक्त गरुड चिन्ह असलेली घंटा वाजवली पाहिजे. असे म्हटले जाते की जो मनुष्य भगवान विष्णूची पूजा करतो तसेच हातात गरूड चिन्ह घेऊन भगवान विष्णूची पूजा करतो, त्याला चांद्रायण व्रत पाळण्याचे फळ मिळते आणि त्या व्यक्तीची अनेक जन्मांची पापे नष्ट होतात.

घंटांचे अनेक प्रकार आहेत

घंटांचे 4 प्रकार आहेत – पहिली गरुड घंटा, दुसरी दाराची घंटा, तिसरी हाताची घंटा आणि चौथी घंटा जर आपण गरुड घंटीबद्दल बोललो तर ती लहान आहे, जी एका हाताने वाजवता येते. डोअर बेल म्हणजे दारावर टांगलेली घंटा. ती लहान आणि मोठ्या दोन्ही आकाराची असते. मंदीरातली घंटा ही पितळी गोल थाळीसारखी असते. जी लाकडी ओंडक्याने मारून वाजवली जाते.

हे सुद्धा वाचा

गरुड घंटा वाजवण्याचे फायदे

  • लाख प्रयत्न करूनही तुमचे काम होत नसेल तर शनिवारी किंवा मंगळवारी मंदिरात पितळी घंटा दान करा. असे केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि रखडलेली कामेही पूर्ण होऊ लागतील.
  • दररोज देवाची पूजा केल्यानंतर आरतीच्या वेळी घंटा वाजवा. यामुळे नशिबाचे बंद दरवाजे उघडतील.
  • दररोज सकाळी स्नान केल्यानंतर गरुड घंटा वाजवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरावर नेहमी आपला आशीर्वाद ठेवते. घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि उत्पन्नाचे स्रोत सतत वाढू लागतात.
  • घरामध्ये दररोज गरूड घंटा वाजवल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये समन्वय निर्माण होतो आणि सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढते.
  • गरुड घंटा वाजवल्याने मनुष्याची उपासना अत्यंत फलदायी व सफल होते अशी श्रद्धा आहे. गरुड घंटीच्या आवाजाने मनाला शांती मिळते आणि मानसिक तणावही कमी होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.