AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपाय… सर्व त्रास होतील दूर !

ज्योतिष शास्त्रानुसार पितृदोष किंवा वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात रोज कापूर जाळावा. ज्योतिष शास्त्रानुसार पितृदोष किंवा राहू-केतूचे वाईट प्रभाव असल्यास, व्यक्तीला खुप त्रासाला सामोरे जावे लागते. हे दोष त्वरीत दूर करण्यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत.

‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपाय… सर्व त्रास होतील दूर !
‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपायImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 7:45 PM

आपल्या घरातील पूजाअर्जेत आपण रोजच कापूर वापरतो. कापूराचा उपयोग (Use of Kapoor) हवन आणि आरतीसाठीही केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही कापूरने अनेक प्रकारचे उपाय देखील करू शकता. या उपायांमुळे ग्रह दोष आणि वास्तु दोष दूर होण्यास मदत होते. हिंदू धर्मात कोणतीही पूजा किंवा विधी कापूरशिवाय पूर्ण मानले जात नाही. पूजेशिवाय अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठीही कापूर उपयुक्त आहे. याच्या नियमित वापराने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्याचे महत्त्व आणि उपयोग वास्तु आणि ज्योतिषशास्त्रातही (Even in astrology) सांगितले आहे. आकस्मिक अपघात टाळण्यासाठी संध्याकाळच्या पूजेच्या वेळी हनुमान चालिसाचा पाठ करा आणि नंतर कापूरमध्ये लवंग टाकून आरती करा. नशीब साथ देत नसेल तर नशीब उजळण्यासाठी अंघोळ करताना पाण्यात कापूर तेलाचे काही थेंब टाकून अंघोळ करा. असे केल्याने शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळण्यासोबतच तुमच्या नशीबालाही सकारात्मक साथ (Positive with luck too) मिळेल.

वाईट गोष्टी थांबणार

वास्तूनुसार, खूप प्रयत्न करूनही काम पूर्ण होत नसेल, काम थांबत असेल, तर चांदीच्या भांड्यात नियमितपणे लवंग आणि कापूर जाळून घरभर फिरवा. यामुळे जीवनातील अडथळे दूर होतील आणि वाईट गोष्टीही घडण्याचे थांबेल.

सकारात्मक उर्जेसाठी कापूर

सकाळी आणि संध्याकाळी; घरामध्ये कापूर जाळावा. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते. हे सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते. त्यामुळे नकारात्मकता दूर होते. त्यामुळे घरात सुख-शांती टिकून राहते.

वास्तूदोष दूर होतो

घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूर वापरता येतो. यासाठी एका भांड्यात कापूर ठेवून त्या ठिकाणी ठेवा. यामुळे वास्तू दोष दूर होण्यास मदत होईल.

पितृदोष, सर्पदोष दूर होईल

अनेकांच्या कुंडलीत पितृदोष आणि काल सर्प दोष असतो. त्यामुळे माणसाला आयुष्यात प्रगती करता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कापूरने उपाय करू शकता. यासाठी घरात तीन वेळा कापूर जाळावा. सकाळी, संध्याकाळी आणि रात्री कापूर जाळावा. पितृदोष आणि काल सर्प दोष दूर होण्यास मदत होते.

शनिदोष दूर होतो

जर कोणाच्या कुंडलीत शनिदोष असेल तर तो कापूरने उपाय करू शकतो. यासाठी आंघोळीच्या पाण्यात कापूर तेल आणि चमेलीचे तेल काही थेंब टाका. त्याबरोबर अंघोळ करा. यामुळे शनिदोष दूर होण्यास मदत होते. राहु-केतू देखील असे केल्याने त्रास होत नाही.

इतर बातम्या

Vastushastra : ‘वास्तूशास्त्रा’ नुसार, दुसऱ्याच्या ‘या’ गोष्टी चुकूनही वापरू नका, होऊ शकते मोठे नुकसान… !

Vastu Tips | वास्तूनुसार इतरांच्या या गोष्टी अजिबात वापरू नका, मोठे नुकसान होऊ शकते!

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.