AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुभ काम करण्यापूर्वी काय फोडतात नारळ, शास्त्रांमध्ये दडलंय रहस्य

Shastra Significance of Coconut: प्रत्येक शुभ कार्यक्रमापूर्वी नारळ का फोडला जातो? त्यामागील शास्त्रीय, ज्योतिषीय आणि वैज्ञानिक कारणे आणि त्याचे शुभ परिणाम जाणून घ्या.

शुभ काम करण्यापूर्वी काय फोडतात नारळ, शास्त्रांमध्ये दडलंय रहस्य
| Updated on: Sep 27, 2025 | 12:45 PM
Share

Shastra Significance of Coconut: हिंदू धर्माक शास्त्र, पूजा, पारंपरिक प्रथा यांना फार महत्त्व आहे. शिवाय कोणत्याही शुभ कार्यात सर्वात मोठं महत्तव नारळाला असतं. नारळ फोडल्याशिवाय कोणतंच शुभ कार्य पूर्ण होत नाही. लहान कार्य असलं तरी नारळाची पूजा केली जाते आणि नारळ फोडला जातो. सांगायचं झालं तर, कोणत्याही शुभ कार्यापूर्वी नारळ फोडणं केवळ एक विधी नाही तर वेद, पुराण, ज्योतिष आणि विज्ञानानुसार ते शुभ, पवित्रता आणि दैवी उर्जेचं प्रतीक देखील आहे.

परंपरनेनुसार असं सांगण्यात आलं आहे की, नारळाचं कठीण कवच अहंकार आणि नकारात्मकतेच्या विध्वंसाचं प्रतीक आहे, तर त्याची पांढरी कण आत्म्याच्या शुद्धतेचं प्रतिनिधित्व करतं. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा शुभारंभ करण्यापूर्वी सकारात्मक उर्जेला आमंत्रित करण्यासाठी नारळ फोडला जातो.

शास्त्रीय महत्व (Shastra Significance of Coconut)

वेद आणि पुराणांमध्ये उल्लेख केल्यानुसार – स्कंद पुराण आणि अग्नि पुराणात नारळाला श्रीफळ असं म्हटलं आहे, ज्याचा अर्थ “लक्ष्मीचे फळ” आहे. हे समृद्धी, सौभाग्य आणि यशाचे प्रतीक मानलं जातं.

त्रिमूर्तीचे प्रतीक – नारळावरील तीन डोळे ब्रह्मा (निर्मिती), विष्णू (संरक्षण) आणि शिव (विनाश) यांचं प्रतिनिधित्व करतात.

शास्त्रीय पुराव्यामध्ये – मंत्र ब्राह्मणात असं म्हटलं आहे की श्रीफलन ब्रह्मसंपन्नम् सर्वकार्येषु पूजितम् म्हणजे, नारळ हे ब्रह्मतत्त्वाने संपन्न असलेलं फळ आहे आणि सर्व शुभ कार्यांमध्ये त्याची पूजा केली जाते.

ज्योतिषशास्त्रीय महत्त्व (Astrological Importance)

ग्रह दोष निवारण: वाहत्या पाण्यात नारळ टाकल्याने ग्रहांचे नकारात्मक परिणाम कमी होतात.

शनिवारचे महत्त्व: असं मानलं जातं की शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली नारळ फोडल्याने शनिदोष कमी होतो आणि भाग्य वाढते.

विशेष तिथी: अमावस्या, नवमी आणि ग्रहशांती पूजा या दिवशी नारळ अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

वैज्ञानिक आणि मानसिक कारणे (Scientific & Psychological Reasons)

शुद्ध पाण्याचे प्रतीक: नारळ पाणी हे बॅक्टेरियामुक्त आणि शुद्ध आहे, म्हणूनच ते अमृताच्या समतुल्य मानले जाते.

अहंकार-त्यागाचा संदेश: कठीण कवच आपल्या अहंकाराचे आणि नकारात्मक विचारांचे प्रतीक आहे.

मानसिक एकाग्रता: नारळ फोडण्याचा आवाज पूजा दरम्यान मानसिक ऊर्जा आणि एकाग्रता वाढविण्यास मदत करतो.

शुभ परिणामांसाठी नारळाचा उपाय

शनिवारी शनिदोष दूर करण्यासाठी नारळ फोडा आणि पाणी अर्पण करा. नवरात्रीत दुर्गा देवीला नारळ अर्पण केल्याने अडथळे दूर होतात. व्यवसायाच्या सुरुवातीला नारळ फोडा आणि त्याचे तुकडे पसरवा जेणेकरून नकारात्मकता दूर होईल.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!