AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुभ काम करण्यापूर्वी काय फोडतात नारळ, शास्त्रांमध्ये दडलंय रहस्य

Shastra Significance of Coconut: प्रत्येक शुभ कार्यक्रमापूर्वी नारळ का फोडला जातो? त्यामागील शास्त्रीय, ज्योतिषीय आणि वैज्ञानिक कारणे आणि त्याचे शुभ परिणाम जाणून घ्या.

शुभ काम करण्यापूर्वी काय फोडतात नारळ, शास्त्रांमध्ये दडलंय रहस्य
| Updated on: Sep 27, 2025 | 12:45 PM
Share

Shastra Significance of Coconut: हिंदू धर्माक शास्त्र, पूजा, पारंपरिक प्रथा यांना फार महत्त्व आहे. शिवाय कोणत्याही शुभ कार्यात सर्वात मोठं महत्तव नारळाला असतं. नारळ फोडल्याशिवाय कोणतंच शुभ कार्य पूर्ण होत नाही. लहान कार्य असलं तरी नारळाची पूजा केली जाते आणि नारळ फोडला जातो. सांगायचं झालं तर, कोणत्याही शुभ कार्यापूर्वी नारळ फोडणं केवळ एक विधी नाही तर वेद, पुराण, ज्योतिष आणि विज्ञानानुसार ते शुभ, पवित्रता आणि दैवी उर्जेचं प्रतीक देखील आहे.

परंपरनेनुसार असं सांगण्यात आलं आहे की, नारळाचं कठीण कवच अहंकार आणि नकारात्मकतेच्या विध्वंसाचं प्रतीक आहे, तर त्याची पांढरी कण आत्म्याच्या शुद्धतेचं प्रतिनिधित्व करतं. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा शुभारंभ करण्यापूर्वी सकारात्मक उर्जेला आमंत्रित करण्यासाठी नारळ फोडला जातो.

शास्त्रीय महत्व (Shastra Significance of Coconut)

वेद आणि पुराणांमध्ये उल्लेख केल्यानुसार – स्कंद पुराण आणि अग्नि पुराणात नारळाला श्रीफळ असं म्हटलं आहे, ज्याचा अर्थ “लक्ष्मीचे फळ” आहे. हे समृद्धी, सौभाग्य आणि यशाचे प्रतीक मानलं जातं.

त्रिमूर्तीचे प्रतीक – नारळावरील तीन डोळे ब्रह्मा (निर्मिती), विष्णू (संरक्षण) आणि शिव (विनाश) यांचं प्रतिनिधित्व करतात.

शास्त्रीय पुराव्यामध्ये – मंत्र ब्राह्मणात असं म्हटलं आहे की श्रीफलन ब्रह्मसंपन्नम् सर्वकार्येषु पूजितम् म्हणजे, नारळ हे ब्रह्मतत्त्वाने संपन्न असलेलं फळ आहे आणि सर्व शुभ कार्यांमध्ये त्याची पूजा केली जाते.

ज्योतिषशास्त्रीय महत्त्व (Astrological Importance)

ग्रह दोष निवारण: वाहत्या पाण्यात नारळ टाकल्याने ग्रहांचे नकारात्मक परिणाम कमी होतात.

शनिवारचे महत्त्व: असं मानलं जातं की शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली नारळ फोडल्याने शनिदोष कमी होतो आणि भाग्य वाढते.

विशेष तिथी: अमावस्या, नवमी आणि ग्रहशांती पूजा या दिवशी नारळ अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

वैज्ञानिक आणि मानसिक कारणे (Scientific & Psychological Reasons)

शुद्ध पाण्याचे प्रतीक: नारळ पाणी हे बॅक्टेरियामुक्त आणि शुद्ध आहे, म्हणूनच ते अमृताच्या समतुल्य मानले जाते.

अहंकार-त्यागाचा संदेश: कठीण कवच आपल्या अहंकाराचे आणि नकारात्मक विचारांचे प्रतीक आहे.

मानसिक एकाग्रता: नारळ फोडण्याचा आवाज पूजा दरम्यान मानसिक ऊर्जा आणि एकाग्रता वाढविण्यास मदत करतो.

शुभ परिणामांसाठी नारळाचा उपाय

शनिवारी शनिदोष दूर करण्यासाठी नारळ फोडा आणि पाणी अर्पण करा. नवरात्रीत दुर्गा देवीला नारळ अर्पण केल्याने अडथळे दूर होतात. व्यवसायाच्या सुरुवातीला नारळ फोडा आणि त्याचे तुकडे पसरवा जेणेकरून नकारात्मकता दूर होईल.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.