AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे! होळीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड, महाराष्ट्रातल्या गावातली 80 वर्ष जुनी परंपरा

भारतामध्ये वेगवेगळ्या परंपरा हमखास जपल्या जातात परंतु भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एका गावात होळीच्या दिवशी नव्या जावयाची चक्क गाढवावर बसवून धिंड काढली जाते.ही परंपरा गेल्या 80 वर्षा पासून पार पाडली जात आहे.

बापरे! होळीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड, महाराष्ट्रातल्या गावातली 80 वर्ष जुनी परंपरा
Holi
| Updated on: Mar 14, 2022 | 1:00 PM
Share

मुंबई : होळी सणाला( Holi festival 2022) काही दिवसच बाकी आहे. देशातील कानाकोपऱ्यात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.अनेक ठिकाणी हा होळीचा सण खेळताना हसी मजाक,चेष्टा मस्करी देखील केली जाते. हा सण वेगवेगळ्या परंपरा जपत साजरा केला जातो. या सणामागे अनेक वेगवेगळ्या भावना देखील प्रत्येकाच्या मनात असतात. महाराष्ट्रातील एका गावामध्ये हा सण साजरा करत असताना चक्क नव्या जावयासोबत गाढवावरून धिंड काढली जाते. ही परंपरा देखील आनंदाने गावकरी साजरा करत असतात. जेव्हा सासरी पहिल्यांदा नवीन जावई आपल्या पत्नीसोबत येतो तेव्हा होळीच्या दिवशी जावयाचा मान सन्मान करून ही परंपरा जावई सोबत साजरी केली जाते. महाराष्ट्रातील बीड मध्ये होळीच्या सणाला जावई सोबत एक आगळीवेगळी परंपरा साजरी केली जाते.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा यवता गावामध्ये होळीच्या दिवशी जावयाला संपूर्ण गावामध्ये गाढवावर बसवून रंग लावण्याची एक परंपरा (holi rituals) आहे. ही परंपरा गेल्या 80 वर्षापासून पार पाडली जात आहे. या परंपरेमागे असलेली कथा देखील तितकीच रंजक आहे.चला तर मग जाणून घेऊया या 80 वर्ष जुन्या परंपरेबद्दल.

खरंतर होळीच्या दिवशी अनेक लोक वेगवेगळे रंग उधळताना आपल्याला पाहायला मिळतात.जर रंग खेळताना रंग नैसर्गिक असतील तर शरीरावरील रंग सहजरित्या निघून जातात परंतु जर होळी खेळताना रंगांमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरले गेले असेल तर शरीरावरुन रंग सहसा निघत नाही. म्हणूनच अनेक जण होळीचा खेळ खेळणे पसंत करत नाही. अनेकजण कुठेतरी लपून बसतात. बहुतेक वेळा जबरदस्तीने रंग लावल्यामुळे भांडणे देखील होतात म्हणूनच “बुरा ना मानो होली हे “अशी म्हण देखील कामी येत नाही अशीच काहीतरी घटना 80 वर्ष पूर्वी घडली होती.

काय आहे आख्यायिका

आजपासून 80 वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा यवता गावामध्ये देशमुख परिवारातील दोन जावयांनी होळीच्या दिवशी रंग लावण्यास मनाई केली होती. सासरकडच्या मंडळींनी रंग लावण्यासाठी त्यांना तयार केले परंतु याचा फारसा काही परिणाम न झाल्यामुळे सासरच्या मंडळींनी फुलांनी सजलेला एक गाढव मागवला आणि त्या गाढवावर दोन्ही जावयांना बसवले.या दोन्ही जावयाची पूर्ण गावामधून मिरवणूक देखील काढली.सुरुवातीला जावयांना गाढवावर बसून मंदिरापर्यंत घेऊन जाण्यात आले. तिथे गेल्यावर जावयांची आरती उतरवण्यात आली. त्यांना नवीन कपडे आणि सोन्याची अंगठी दिली गेली. तिथे गेल्यावर त्यांचे तोंड गोड करण्यात आले आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर रंग लावण्यात आला. त्या दिवसापासून ते आजतगायत या गावांमध्ये असेच घडत आलेले आहे म्हणूनच ही परंपरा आज ही तशीच जपली जात आहे.

या गावांमध्ये प्रत्येक वर्षी होळी सणाच्या पूर्वी नव्या जावयाचा शोध घेतला जातो. ज्या जोडप्यांचे नवीन नवीन लग्न झालेले आहे,अशा जावयांना होळीच्या दिवशी गावांमध्ये आमंत्रित केले जाते. गावातील होळी नव्या जावया सोबत साजरी केली जाते. बहुतेक वेळा गावातील जावई या परंपरेपासून पळ काढण्यासाठी कुठेतरी लपून देखील बसतात परंतु गावकऱ्यांची या जावयांवर संपूर्ण नजर असते, जेणेकरून ही परंपरा प्रत्येक वर्षी जपली गेली पाहिजे. या परंपरेमध्ये कोणताही खंड पडू नये म्हणून गावकरी नेहमी काळजी घेत असतात परंतु गेल्या वर्षी कोरोना महामारी च्या कारणामुळे ही परंपरा साजरी करण्यात आली नव्हती. या वर्षी ही परंपरा साजरी करण्यासाठीं गावकरी जय्यत तयारी करत आहेत. आता तुम्हाला सुद्धा या परंपरेबद्दल मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतील. ही परंपराच आगळी वेगळी आहे.ही परंपरा जरी विचित्र असली तरी गावांमध्ये तितक्याच जल्लोषाने आणि आनंदात साजरी केली जाते.

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.