AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT: सेलिब्रिटी आजकाल साधू-संत झाले आहेत? धीरेंद्र शास्त्रींनी दिलेल्या उत्तराने वेधले लक्ष

WITT Global Summit 2025: बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी TV9 च्या WITT 2025 मध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्यांना 'सेलिब्रिटी आजकाल साधू-मुनी झाले आहेत का?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. आता त्यांनी काय उत्तर दिले चला पाहूया...

WITT: सेलिब्रिटी आजकाल साधू-संत झाले आहेत? धीरेंद्र शास्त्रींनी दिलेल्या उत्तराने वेधले लक्ष
WITTImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 29, 2025 | 2:56 PM
Share

What India Thinks Today 2025 Summit: देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्कने Tv9ने आपल्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2025’ कार्यक्रमाचे २८ मार्च रोजी आयोजन केले होते. हा कार्यक्रम २ दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपासून ते मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज देखील सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान प्रत्येकजण वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मते मांडली आहेत. दरम्यान, धीरेंद्र शास्त्रींनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यांना ‘सेलिब्रिटी आजकाल साधू-मुनी झाले आहेत का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री यांना WITT च्या मंचावर काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये ‘ते एक कथाकार आणि संत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा वापर करून ते पत्रिका काढतात आणि लोकांच्या समस्यांवर उपाय सांगतात. यावर आम्ही काय बोलणार’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री उत्तर देत म्हणाले, ‘आम्ही सनातनचे सामान्य सैनिक आहोत, सनातनने जे काम केले पाहिजे ते आम्ही करत आहोत. कथेच्या माध्यमातून आणि दरबारातून हनुमानजींनी यश मिळवले आहे, आपल्याला नाही. आपण फक्त त्यांचे नाव घेतो.’

‘भविष्य सांगण्यावर आमचा विश्वास नाही’

या प्रश्नाला उत्तर देताना बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, आपल्या परंपरेपासून चालत आलेली परंपरा आहे. आमचे आजोबा गुरुजींचीही ही परंपरा होती, त्यांच्या आजोबांचीही हीच परंपरा होती. त्या परंपरेचा एक भाग आम्ही जपला आहे. आपण सनातनचे सैनिक राहिले पाहिजे असे मला वाटते. हे सनातनसाठी आणि आपल्यासाठीही खूप चांगले आहे. कारण आपण मी भविष्य सांगण्यावर विश्वास ठेवत नाही, तर आपण भविष्य घडवण्यावर खूप विश्वास ठेवतो.’

बाबा बागेश्वर यांना विचारण्यात आले, ‘कथाकार आणि सेलिब्रिटी संत होत आहेत का?’ या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्री यांनी उत्तर दिले की, ‘सेलिब्रेटी हा वेगळा विषय आहे. आमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांच्या माध्यमातून देशापर्यंत पोहोचवणे हे आमचे काम आहे. देशापर्यंत संदेश कसा पोहोचला पाहिजे? त्याच्यासाठी TV9 भारतवर्ष आहे.’

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.