AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: आयर्लंडविरुद्ध पराभवामागे कोण जबाबदार? अर्धशतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माने सांगितली भलतीच कारण

भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रंगला आणि हा सामना आयर्लंडने जिंकला. हा सामन्यातील पराभवामागे कोण जबाबदार आहे आता यावर अभिषेक शर्माने स्पष्टच सांगितले आहे.

IND vs IRE: आयर्लंडविरुद्ध पराभवामागे कोण जबाबदार? अर्धशतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माने सांगितली भलतीच कारण
abhishek sharma
| Updated on: Jun 27, 2026 | 12:39 PM
Share

बेलफास्ट येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. अभिषेक शर्मा वगळता, कोणताही भारतीय फलंदाज लक्षणीय खेळी करू शकला नाही. भारताच्या पराभवासाठी विविध कारणे दिली जात आहेत. काही जण फलंदाजांना दोष देत आहेत, तर काही जण गोलंदाजांना. आयर्लंडने प्रथमच भारतीय संघाला पराभव करुन इतिहास रचला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला होता आणि पण त्यांना सामना जिंकता आला नाही. मात्र, टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माने या पराभवासाठी आयर्लंडमधील कोणत्या गोष्टीला जबाबादार धरले ते पाहा…

बेलफास्ट येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक शर्मा म्हणाला, “आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही हवामान आणि खेळपट्टीच्या परिस्थितीशी किती लवकर जुळवून घेतो. जेव्हा सामने एकापाठोपाठ एक होत असतात, तेव्हा संपूर्ण संघाला त्वरीत समन्वय साधावा लागतो. सराव सत्र असो वा सामना, आम्हाला परिस्थिती त्वरीत समजून घेणे आवश्यक असते. आज आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत होतो, पण दुर्दैवाने ते जमले नाही.”

भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाने भारतासमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने 20 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या, परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ न मिळाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अखेरीस, भारतीय संघ 20 षटके फलंदाजी करू शकला नाही आणि 148 धावांवर सर्वबाद झाला. आता भारतीय संघ दुसऱ्या टी-20 सामन्यात पुनरागमन करू शकतो का, हे पाहणे बाकी आहे.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना 28 जून रोजी खेळला जाईल. भारतीय संघ मालिका पराभव टाळण्याच्या उद्देशाने या सामन्यात उतरेल. ही मालिका केवळ दोन सामन्यांची असल्याने, भारतीय संघ आता मालिका जिंकू शकत नाही. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघावर मालिका गमावण्याचा मोठा धोका आहे. अशा परिस्थितीत, भारतीय संघ दुसऱ्या टी-20 मध्ये जोरदार पुनरागमन करून कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवू इच्छितो.

Follow Us
लावा रे तो ऑडियो... पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट...
लावा रे तो ऑडियो... पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट...
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्या पत्रकार परिषदेत हे काय सांगितलं?
ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोर
Arvinad Swanat | ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोरच...
ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar | ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह... पहा व्हिडीओ
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस