AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर संजय मांजरेकरने मीठ चोळलं! दक्षिण अफ्रिकेचे आभार मानत म्हणाला…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारताचा दारूण पराभव झाला आहे. दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी पराभवाची धूळ चारली आहे. या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे. यात माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी तर थेट दक्षिण अफ्रिकेचा आभार मानले आहेत. त्याचं कारण असं की...

टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर संजय मांजरेकरने मीठ चोळलं! दक्षिण अफ्रिकेचे आभार मानत म्हणाला...
टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर संजय मांजरेकरने मीठ चोळलं! दक्षिण अफ्रिकेचे आभार मानत म्हणाला...Image Credit source: PTI
| Updated on: Feb 23, 2026 | 4:35 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. पण सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर उपांत्य फेरी गाठेल की नाही याबाबत शंका आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाला पहिल्यांदाच 76 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. इतक्या मोठ्या फरकाने पराभव झाल्याने नेट रनरेटचं गणित चुकलं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर याने टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. इतकंच काय तर दक्षिण अफ्रिकेचे आभारही मानले आहेत. संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दक्षिण अफ्रिकेचे आभार व्यक्त केले आहेत. कारण त्यामुळे टीम इंडियाला मोठा धडा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच पुढे काय करायला हवं? याबाबत समजवून फुंकरही घातली आहे.

संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘दक्षिण अफ्रिकेचे आभार, कारण त्यांच्यामुळे टीम इंडियाला पुढे काय करायचं ते कळलं आहे. फलंदाजांना फिरकीविरुद्ध चांगल्या तंत्रासह खेळावं लागेल. थ्रो डाउन सरावात स्लोअर चेंडूंचा जास्तीत जास्त सराव करावा लागेल. तसेच कुलदीप यादवला निश्चितच संधी दिली पाहिजे.’ टीम इंडियाच्या दारूण पराभवाला फलंदाजांची हाराकिरी समोर आली आहे. कारण भारतीय फलंदाजांनी फिरकी आणि स्लोअर चेंडूंसमोर गुडघे टेकले.

इशान किशन ऑफ स्पिनर एडन मार्करमसमोर काहीच करू शकला नाही. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे टीम इंडियावर पहिल्या षटकापासून दबाव वाढला. दुसरीकडे, आक्रमक फलंदाज अभिषेक शर्माला स्लोअर चेंडूवर फसवलं. 15 धावांवर असताना मार्को यानसेनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तिलक वर्माची स्थिती काही वेगळी नाही. त्याने फक्त 1 धाव केली. तर कर्णधार सूर्यकुमार यादव 18 धावा करून बाद झाला. भारताविरुद्ध केशव महाराजने 3, मार्को यानसेनने 4 आणि कॉर्बिन बॉशने 2 विकेट घेतल्या. या स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी आणखी एक नकोसा विक्रम रचला आहे. भारताचे फलंदाज 11वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?