AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: 1 चेंडू राखून पाकिस्तानचा रोमांचक विजय, 5 पॉइंट मधून समजून घ्या भारताच्या पराभवाची कारणं….

IND vs PAK: परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने 5 विकेट राखून हा सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना सात विकेट गमावून 181 धावा केल्या.

IND vs PAK: 1 चेंडू राखून पाकिस्तानचा रोमांचक विजय, 5 पॉइंट मधून समजून घ्या भारताच्या पराभवाची कारणं....
team india Image Credit source: AFP
| Updated on: Sep 05, 2022 | 7:10 AM
Share

मुंबई: आशिया कप स्पर्धेत सुपर 4 राऊंड सुरु झाला आहे. काल दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान मध्ये सामना झाला. परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने 5 विकेट राखून हा सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना सात विकेट गमावून 181 धावा केल्या. पाकिस्तानच्या टीमने हे लक्ष्य एक चेंडू बाकी राखून पार केलं.

भारत-पाकिस्तान सामना नेहमी अटी-तटीचा होता. तो रोमांच, उत्साह या सामन्यात सुद्धा पहायला मिळाला. दोन्ही टीम्सनी जिंकण्यासाठी आपली ताकत पणाला लावली. सामन्यात अनेक चढ-उतार पहायला मिळाले. शेवटच्या षटकात सामन्याचा निकाल लागला. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात अखेर पाकिस्तानने विजय मिळवला.

पाकिस्तानला याच मैदानात आठवड्याभरापूर्वी 28 ऑगस्टला भारताने पराभूत केलं होतं. त्याची परतफेड पाकिस्तानच्या टीमने केली. कालच्या सामन्यातील भारताच्या पराभवाची पाच कारणं समजून घेऊया.

  1. 18 व्या ओव्हर मध्ये अर्शदीप सिंहने आसिफ अलीचा सोपा झेल सोडला. पाकिस्तानसाठी हे जीवनदा फायद्याचं ठरलं. कारण त्यानंतर आसिफने मोठे फटके खेळून भारताकडून विजय हिरावून घेतला.
  2. मोहम्मद रिजवान आणि मोहम्मद नवाजने महत्त्वपूर्ण भागीदारी केली. टीम संकटात होती. त्यांनी आपले दोन महत्त्वाचे फलंदाज गमावले होते. त्यावेळी दोघांनी 73 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. पाकिस्तानच्या विजयाचा पाया रिजवान-नवाज जोडीने रचला.
  3. रोहित शर्मा आणि केएल राहुल जोडीने जबरदस्त सुरुवात करुन दिली होती. टीमची धावसंख्या 200 पर्यंत पोहोचेल असं वाटलं होतं. पण टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. त्यामुळे टीम इंडियाला अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं नाही.
  4. भुवनेश्वर कुमारने टाकलेलं 19 व षटक महागडं ठरलं. त्या ओव्हर मध्ये 19 धावा निघाल्या. त्याच ओव्हर मध्ये विजय भारताच्या हातून निसटला.
  5. पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी या मॅच मध्ये शानदार गोलंदाजी केली. नवाज आणि शादाब खानने जास्त धावा दिल्या नाहीत. त्याचवेळी विकेट घेण्यातही यशस्वी ठरले. नवाजने 4 ओव्हर मध्ये 25 धावा देऊन एक विकेट घेतला. शादाबने चार ओव्हर मध्ये 31 धावा देऊन दोन विकेट काढल्या.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.