AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : ‘मला वाटतं की…’; विराट कोहली याने टीम इंडियाच्याच खेळाडूंना केलं अलर्ट!

वर्ल्ड कप 2022 मध्ये कोहलीने पाकिस्तानल एकट्याच्या दमावर पाणी पाजलं होतं. खास करून पाकिस्तानचा स्टार बॉलर हॅरीस रॉफ याला मारलेले दोन सिक्स सर्व जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात तसेच आहेत. विराटने उद्याच्या सामन्याआधीच पाकिस्तानचा गोलंदाजीबाबत मोठं विधान केलं आहे.

IND vs PAK : 'मला वाटतं की...'; विराट कोहली याने टीम इंडियाच्याच खेळाडूंना केलं अलर्ट!
virat kohli rohit sharma
| Updated on: Sep 01, 2023 | 4:26 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 च्या थराराला सुरूवात झाली असली तरी खरी सुरूवात ही भारत-पाक सामन्यापासून होणार आहे. सर्व क्रिकेट प्रेमींना 2 सप्टेंबरला होणाऱ्या इंडिया आणि पाकिस्तान या हाय-वोल्टेज सामन्याची उत्सुकता आहे. या सामन्यात टीम इंडियाचा हुकमी एक्का विराट कोहलीकडुन सर्वा भारतीय चाहत्यांना अपेक्षा असणार आहेत. वर्ल्ड कप 2022 मध्ये कोहलीने पाकिस्तानल एकट्याच्या दमावर पाणी पाजलं होतं. खास करून पाकिस्तानचा स्टार बॉलर हॅरीस रॉफ याला मारलेले दोन सिक्स सर्व जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात तसेच आहेत. विराटने उद्याच्या सामन्याआधीच पाकिस्तानचा गोलंदाजीबाबत मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाला विराट?

मला वाटतं की त्यांचा बॉलिंग लाईनअप मजबूत असून इम्पॅक्ट टाकणारे बॉलर आहेत. जे कोणत्या हीवेळी संपूर्ण सामन्याचं स्वरूप पालटू शकतात. अशा बॉलर्सचा सामना करण्यासाठी आम्हाला दमदार प्रदर्शनाची गरज असल्याचं विराट कोहली म्हणाला.

विराट कोहलीने जे वक्तव्य केलं आहे ते टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने लक्षात ठेवायला हवं. पाकिस्तान एक मजबूत संघ असून बॅटर आणि बॉलरचा योग्य समतोल त्यांच्याकडे आहे. टॉप आर्डरने काहीवेळ मैदानावर टिकून राहायला हवं. लवकर विकेट गेल्याने संघावर दबाव येऊ शकतो. त्याचा मोठा फटका टीम इंडियाला बसब शकतो.

दरम्यान, पाकिस्तानकडे शाहिनशाह आफ्रिदी, नसीम शहा, हॅरीस रॉफसारखे तगडे बॉलर आहेत. तर शादाब खानसारखा उत्कृष्ट स्पिनर आहे. नेपाळविरूद्धच्या सामन्यात कर्णधार बाबर आझमने 151 धावांची दमदार खेळी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनाही पाकिस्तानच्या फलंदाजांना लवकरात लवकर आऊट करायला हवं. जर मोठ्या भागीदारी झाल्यातर टीमच्या पराभवासाठी तेवढं कारणस पुरेसं ठरु शकतं.

आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.