AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : एकदा नाही तर 3 वेळा भिडणार टीम इंडिया-पाकिस्तान! चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान मोठी अपडेट

India vs Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आधी या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना 23 फेब्रुवारी रोजी पार पडला. टीम इंडियाने या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता हे दोन्ही संघ तब्बल 3 वेळा आमनेसामने येऊ शकतात.

IND vs PAK : एकदा नाही तर 3 वेळा भिडणार टीम इंडिया-पाकिस्तान! चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान मोठी अपडेट
india vs pakistan bumrah and viratImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 27, 2025 | 9:13 PM
Share

टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा हा दुबईतील एकदिवसीय क्रिकेटमधील सातवा आणि पाकिस्तान विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीतील तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये हायव्होल्टेज सामन्याचा थरार रंगणार आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया कप 2025 स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. अवघ्या काही महिन्यांनी पुन्हा एकदा हे दोन्ही संघ भिडणार आहेत. त्यानुसार दोन्ही संघात एक, दोन नाही, तर तब्बल 3 सामने होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदा टी 20i फॉर्मेटनुसार आशिया कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यातील दुसर्‍या ते चौथ्या आठवड्या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.

तब्बल 3 वेळा भिडणार भारत-पाक!

येत्या 2026 वर्षात टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टी 20i फॉर्मेटनुसार आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सहभागी 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात येणार आहे. तसेच टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात असतील. त्यानंतर दोन्ही संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरले तर सुपर 4 मध्ये उभयसंघात दुसरा सामना होऊ शकतो. तर अंतिम सामन्यात दोन्ही संघ पोहचले तर उभयसंघ एकूण तिसऱ्यांदा आमनेसामने असतील. अशाप्रकारे एकूण 3 वेळा भारत-पाक आमनेसामने येऊ शकतात.

स्पर्धेचं आयोजन कुठे?

दरम्यान या स्पर्धेंचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. त्यानुसार या स्पर्धेतील सर्व सामने हे भारतात खेळवण्यात आले पाहिजे. मात्र भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामुळे उभयसंघातील सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यावरुन सहमती आहे. त्यामुळे टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामने हे श्रीलंका किंवा यूएई येथे होऊ शकतात.

एकूण 8 संघ कोणते?

आगामी आशिया कप 2025 स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग हे 8 संघ सहभागी होणार आहेत. नेपाळ यंदा या स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.