AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : एकदा नाही तर 3 वेळा भिडणार टीम इंडिया-पाकिस्तान! चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान मोठी अपडेट

India vs Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आधी या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना 23 फेब्रुवारी रोजी पार पडला. टीम इंडियाने या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता हे दोन्ही संघ तब्बल 3 वेळा आमनेसामने येऊ शकतात.

IND vs PAK : एकदा नाही तर 3 वेळा भिडणार टीम इंडिया-पाकिस्तान! चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान मोठी अपडेट
india vs pakistan bumrah and viratImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 27, 2025 | 9:13 PM
Share

टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा हा दुबईतील एकदिवसीय क्रिकेटमधील सातवा आणि पाकिस्तान विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीतील तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये हायव्होल्टेज सामन्याचा थरार रंगणार आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया कप 2025 स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. अवघ्या काही महिन्यांनी पुन्हा एकदा हे दोन्ही संघ भिडणार आहेत. त्यानुसार दोन्ही संघात एक, दोन नाही, तर तब्बल 3 सामने होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदा टी 20i फॉर्मेटनुसार आशिया कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यातील दुसर्‍या ते चौथ्या आठवड्या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.

तब्बल 3 वेळा भिडणार भारत-पाक!

येत्या 2026 वर्षात टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टी 20i फॉर्मेटनुसार आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सहभागी 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात येणार आहे. तसेच टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात असतील. त्यानंतर दोन्ही संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरले तर सुपर 4 मध्ये उभयसंघात दुसरा सामना होऊ शकतो. तर अंतिम सामन्यात दोन्ही संघ पोहचले तर उभयसंघ एकूण तिसऱ्यांदा आमनेसामने असतील. अशाप्रकारे एकूण 3 वेळा भारत-पाक आमनेसामने येऊ शकतात.

स्पर्धेचं आयोजन कुठे?

दरम्यान या स्पर्धेंचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. त्यानुसार या स्पर्धेतील सर्व सामने हे भारतात खेळवण्यात आले पाहिजे. मात्र भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामुळे उभयसंघातील सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यावरुन सहमती आहे. त्यामुळे टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामने हे श्रीलंका किंवा यूएई येथे होऊ शकतात.

एकूण 8 संघ कोणते?

आगामी आशिया कप 2025 स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग हे 8 संघ सहभागी होणार आहेत. नेपाळ यंदा या स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक