AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशियाई 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा; सलामीच्या लढतीमध्ये भारताचा विजय; महाराष्ट्राच्या राजवर्धन, कौशलची अप्रतिम गोलंदाजी

हरनूर सिंगचे शतक तसेच राजवर्धन हंगगेंकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने आशियाई 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच समान्यात बाजी मारली आहे. गुरुवारी झालेल्या स्पर्धेतील सलामीच्या लढतीमध्ये भारताने संयुक्त अरब अमिराती( UAE)चा 154 धावांनी धुव्वा उडवला.

आशियाई 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा; सलामीच्या लढतीमध्ये भारताचा विजय; महाराष्ट्राच्या राजवर्धन, कौशलची अप्रतिम गोलंदाजी
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 1:49 PM
Share

दुबई : हरनूर सिंगचे शतक तसेच राजवर्धन हंगगेंकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने आशियाई 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच समान्यात बाजी मारली आहे. गुरुवारी झालेल्या स्पर्धेतील सलामीच्या लढतीमध्ये भारताने संयुक्त अरब अमिराती( UAE)चा 154 धावांनी धुव्वा उडवला. भारताने संयुक्त अरब अमिरातीसमोर 283 धावांचे आवाहन ठेवले होते. मात्र धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज भारतीय भेदक गोलंदाजीचा सामना करू शकले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 34. 2 षटकांमध्ये अवघ्या 128 धावांवर गारद झाला. भारताकडून राजवर्धन याने तीन तर विकी, कौशल व गर्व यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

अमिरातीने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी अंमत्रित केले होते. तिसऱ्याच षटकामध्ये भारताला अंगक्रिश रघवंशीच्या रुपाने पहिला धक्का बसला. तो वयक्तीक दोन धावांवर असताना धावबाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या रशीद शेख आणि हरनूरसिंग यांनी 90 धावांची भागीदारी करत भरताची एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली. त्यानंतर अयान अफजल खान यांने रशीद खानला बाद केले. मात्र दुसऱ्या बाजून हरनूर सिंग याने भारताची बाजू लावून धरली. त्याने 130 चेंडूमध्ये 11 चौकारांच्या मदतीने 120 धावा फटकावल्या. याच 120 धावांच्या बळावर भारताने 283 धवांचा पल्ला गाठला.

भारताची गोलंदाजीमध्ये वर्चस्व

मात्र भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उरलेल्या प्रतिस्पर्धी संघाला भारतीय गोलंदाजीचा सामना करता आला नाही. ठराविक अंतराने त्यांच्या विकेट पडल्या. त्यांचा संघ 34. 2 षटकांमध्ये अवघ्या 128 धावांवर गारद झाला. भारताकडून राजवर्धन याने तीन तर विकी कौशल व गर्व यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या विजयासोबत भारताने स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. दरम्यान भारताच्या या विजयामध्ये मराठमोळ्या राजवर्धन हंगगेंकर आणि कौशल तांबे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले, राजवर्धन याने तीन तर कौशल याने दोन गडीबाद केले. राजवर्धन हा सोलापूर जिल्ह्यातल्या तुळजापूरचा रहिवाशी आहे. तर कौशल तांबे हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील रहिवासी आहे.

संबंधित बातम्या

Sachin Tendulkar : सिराजच्या पायात स्प्रिंग असल्यासारखं वाटतं, सचिन तेंडुलकरच्या शाबासकीनंतर मोहम्मद सिराज म्हणाला…

Pro Kabaddi 2021 Time Table Today: यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली, किती वाजता, कुठे पाहाल सामना

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.