AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: Bcci कडून टीम इंडियासाठी इतक्या कोटींचं बक्षिस जाहीर, प्रत्येकाला किती रक्कम मिळणार?

Bcci Prize Money For Asia Cup 2025 Winner Team India : बीसीसीआयने आशिया कप विजेत्या भारतीय संघासाठी 21 कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.

IND vs PAK: Bcci कडून टीम इंडियासाठी इतक्या कोटींचं बक्षिस जाहीर, प्रत्येकाला किती रक्कम मिळणार?
Asia Cup 2025 Winner Team India Playing 11Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Sep 29, 2025 | 3:37 AM
Share

टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. भारताचा हा 17 व्या टी 20 आशिया कप स्पर्धेतील एकूण आणि सलग सातवा तसेच पाकिस्तान विरुद्धचा तिसरा विजय ठरला. भारताने यासह टी 20I आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताची आशिया कप जिंकण्याची नववी वेळ ठरली. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामिगिरीनंतर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने भारतासाठी बक्षिस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

बीसीसीआयने पेटारा उघडला

बीसीसीआयने आशिया कप विजेत्या भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयने 21 कोटी रुपये बक्षिस म्हणून देणार असल्याचं जाहीर केलंय. बीसीसीआयने आशिया कप स्पर्धेसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंना स्थान दिलं होतं. तर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मुख्य प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, बॉलिंग-बॅटिंग आणि फिल्डिंग कोच असे एकूण 5 सदस्य आहेत. अशाप्रकारे टीम इंडियाचे 15 खेळाडू आणि 5 सपोर्ट स्टाफमधील सदस्य असे मिळून हा आकडा 20 होतो. त्यामुळे प्रत्येकाला 1 कोटी रुपये मिळतील, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तसेच ही रक्कम कमी जास्त होऊ शकते. मात्र बीसीसीआयच्या या निर्णयामुळे खेळाडू आणखी मालामाल होतील इतकं मात्र निश्चित आहे.

भारताने सामना असा जिंकला

पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहाने याने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर फखर झमान याने 46 धावांचं योगदान दिलं. सॅम अयुबने 14 धावा जोडल्या. तर टीम इंडियाने इतरांना झटपट गुंडाळलं. टीम इंडियाने पाकिस्तानचं अशाप्रकारे 19.1 ओव्हरमध्ये 146 रन्सवर पॅकअप केलं.

टीम इंडियाची 147 धावांच्या प्रत्युत्तरात निराशाजनक सुरुवात राहिली. भारताने 20 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे या त्रिकुटाने निर्णायक खेळी करत भारताला विजयी केलं. तिलकने संजूसह चौथ्या आणि शिवमसह पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजयी केलं. संजूने 24 आणि शिवमने 33 धावा केल्या. तर तिलक वर्मा विजयी करुन नाबाद राहिला. तिलकने नाबाद 69 धावांची खेळी केली. भारताने 2 बॉलआधी 5 विकेट्स गमावून हा सामना जिंकला आणि सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा आपला विक्रम आणखी भक्कम केला.

बीसीसीआयकडून बक्षिस रक्कम जाहीर

भारत सर्वात यशस्वी संघ

दरम्यान टीम इंडियाची आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची स्पर्धेच्या इतिहासातील नववी वेळ ठरली. टीम इंडियाने याआधी 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 साली आशिया कप जिंकला होता. तर आता भारताने सूर्याच्या नेतृत्वात ही ट्रॉफी आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळवलंय.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा