AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: बीसीसीआयकडून बांग्लादेश-इंग्लंड विरूद्धच्या मालिकेसाठी मोठा निर्णय

Bcci Team India: बीसीसीआयने टीम इंडियाच्या 3 सामन्यांच्या ठिकाणात बदल केला आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Team India: बीसीसीआयकडून बांग्लादेश-इंग्लंड विरूद्धच्या मालिकेसाठी मोठा निर्णय
team india sky yashasviImage Credit source: Pankaj Nangia/Getty Images
| Updated on: Aug 13, 2024 | 9:34 PM
Share

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यानंतर आता विश्रांतीवर आहे. टीम इंडिया त्यानंतर आपली पुढील मालिका बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी आणि टी 20i मालिका होणार आहे.त्यासाठी बांगलादेश भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. रोहितसेना त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. तर नववर्षात अर्थात 2025 मध्ये इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडियाचं पुढील काही महिन्याचं शेड्यूल पॅक आहे. अशात बीसीसीआयने टीम इंडियाच्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने 2024-2025 या वर्षांमध्ये भारतात होणार्‍या आंतरराष्ट्रीय सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

बीसीसीआयने टीम इंडियाच्या 3 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. बीसीसीआयने बांगलादेश आणि इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात बदल केला आहे. विशेष बाब म्हणजे इंडिया-बांगलादेश यांच्यात होणारा एक सामना हा नव्या स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया-बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 मॅचची टी 20i सीरिज होणार आहे. या टी 20 मालिकेतील सलामीचा सामना 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. हा सामना आता ग्वाल्हेर येथे होणार आहे जो आधी हिमाचल प्रदेश येथील धर्मशाला येथे आयोजित करण्यात आला होता. धर्मशालेतील स्टेडियममध्ये दुरूस्तीचं काम सुरु असल्याने ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

3 टी 20i सामन्यांचं ठिकाण बदललं

इंग्लंड भारत दौऱ्याची सुरुवात 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेने करणार आहे. तर त्यानंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. बीसीसीआयने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या 2 टी20i सामन्यांचं ठिकाण बदललं आहे. उभयसंघातील पहिला सामना हा 22 जानेवारी रोजी चेन्नईत होणार होता, मात्र आता कोलकातात आयोजित करण्यात आला आहे. तर चेन्नईत 25 जानेवारी रोजी होणारा दुसरा सामना हा चेन्नईत होणार आहे. कोलकाता पोलिसांनी 26 जानेवारीच्या (प्रजासत्ताक दिन) पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने सामन्याचं ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. त्यानुसार ठिकाण बदललं असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग.

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग

उद्धव ठाकरे जे म्हणाले तोच ममता बॅनर्जींचा संदेश, 21 जुलैनंतर…पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार?.

उद्धव ठाकरे जे म्हणाले तोच ममता बॅनर्जींचा संदेश, 21 जुलैनंतर…पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार?

कसा आहे तब्बल २५०० कोटींचा सिनेमा? क्रिस्टोफर नोलनच्या The Odyssey ची जगभर महाक्रेज.

कसा आहे तब्बल २५०० कोटींचा सिनेमा? क्रिस्टोफर नोलनच्या The Odyssey ची जगभर महाक्रेज

‘डर्टी संजय राऊत.., लाज वाटायला पाहिजे…’, राणेंचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर; नागपुरातील रामरक्षा आंदोलनापूर्वी वातावरण तापलं.

‘डर्टी संजय राऊत.., लाज वाटायला पाहिजे…’, राणेंचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर; नागपुरातील रामरक्षा आंदोलनापूर्वी वातावरण तापलं

सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला…  चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!.

सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला… चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!

दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले सरकारने संवाद साधावा!.

दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले सरकारने संवाद साधावा!