IND vs SA : टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? कॅप्टन सूर्यकुमार शुबमनबाबत म्हणाला….
India vs South Africa 2nd T20i Post Match : पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 51 धावांनी मात केली.दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

टीम इंडियाला गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्या टी 20i सामन्यात पराभूत व्हावं लागलं. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 51 धावांनी मात केली. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 214 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताचं 19.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर पॅकअप केलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. न्यू चंदीडगमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने हा लाजिरवाणा पराभव असल्याचं म्हटलं. तसेच सूर्याने पराभवाचं कारणही सांगितलं. सोबतच सूर्याने उपकर्णधार शुबमन गिल याच्या निराशाजनक कामगिरीबाबतही भाष्य केलं.
