AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma | रोहित शर्मा याची खेळपट्टीच्या वादावरुन प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियाला मिर्ची लागेल

ऑस्ट्रेलियाने नागपूरमध्ये टीम इंडिया विरुद्ध खेळण्याआधीच खेळपट्टीचा वाद उकरला. या खेळपट्टीवरुन टीम इंडियावर अनेक आरोप करण्यात आले.मात्र कॅप्टन रोहित शर्मा जे बोलला ते ऐकूण कांगारुना मिर्ची लागेल.

Rohit Sharma | रोहित शर्मा याची खेळपट्टीच्या वादावरुन प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियाला मिर्ची लागेल
| Updated on: Feb 11, 2023 | 7:33 PM
Share

नागपूर : टीम इंडियाने नागपूरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 132 धावा आणि एक डावाने तिसऱ्या दिवशी विजय मिळवला. या सामन्याचं आयोजन हे नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधला. रोहितने या पत्रकार परिषदेत खेळपट्टीच्या वादावरुन प्रतिक्रिया दिली. रोहितची प्रतिक्रिया ऐकून कांगारुंना नक्कीच झोंबेल. नागपूर कसोटीआधी आपल्या सोयीने टीम इंडियाने खेळपट्टी तयार केल्याचा आरोप हा ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांकडून करण्यात आला होता.

व्हीसीएच्या खेळपट्टीत काहीच वाईट नसल्याचं मत रोहितचं आहे. फिरकीसाठी उपखंडीय खेळपट्टी फायदेशीर आहेत.मात्र त्यासाठी प्लाननुसार खेळणं गरजेचं असतं.ज्या खेळपट्ट्यांवर कांगारुंच्या फलंदाजांना टिकता आलं नाही, त्याच पीचपर रोहितने शतक ठोकलं. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 177 धावांवर ऑलआऊट झाली.

रोहित काय म्हणाला?

“अशा प्रकारच्या खेळपट्टीवर धावा करण्यासाठी अशी पद्धत वापरायला हवी जी पारंपरिक नसेल. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारच्या पीचवर खेळलोय, तिथे धावा करण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो तसेच प्लानिंगही असावी लागते”, असं रोहितने स्पष्ट केलं.

रोहित मुंबईच्या खेळपट्टीबाबत काय म्हणाला?

“मी मुंबईत खेळता खेळता मोठा झालोय, मुंबईची खेळपट्टी फार टर्न होते. तुम्हाला थोडं साचेबद्धपणे खेळायला नको. खेळताना पायाचा वापर करायला हवा. काहीतरी वेगळं करुन गोलंदाजांवर दबाव टाकण्याची गरज असते. या सर्व वेगळ्यापणात तुम्हाला शक्य ते करा, जसं की स्वीप शॉट, रिव्हर्स स्वीप मारा”, असंही रोहित म्हणाला.

दरम्यान टीम इंडियाने विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कॅप्टन रोहितसह फिरकी गोलंदाज या विजयाचे शिल्पकार ठरले. आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या तिकडीने टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

पहिल्या डावात अक्षर पटेल याने 84 आणि रवींद्र जडेजाने 70 धावा केल्या. आर अश्विनने 23 धावा जोडल्या. जडेजाने बॉलिंग करताना पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 7 विकेट्स घेतल्या. आर अश्विन याने दुसऱ्या डावात 5 आणि पहिल्या डावात 3 अशा एकूण 8 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल याने 1 विकेट घेतली.

दरम्यान मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमम्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...