AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma | रोहित शर्मा याची खेळपट्टीच्या वादावरुन प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियाला मिर्ची लागेल

ऑस्ट्रेलियाने नागपूरमध्ये टीम इंडिया विरुद्ध खेळण्याआधीच खेळपट्टीचा वाद उकरला. या खेळपट्टीवरुन टीम इंडियावर अनेक आरोप करण्यात आले.मात्र कॅप्टन रोहित शर्मा जे बोलला ते ऐकूण कांगारुना मिर्ची लागेल.

Rohit Sharma | रोहित शर्मा याची खेळपट्टीच्या वादावरुन प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियाला मिर्ची लागेल
| Updated on: Feb 11, 2023 | 7:33 PM
Share

नागपूर : टीम इंडियाने नागपूरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 132 धावा आणि एक डावाने तिसऱ्या दिवशी विजय मिळवला. या सामन्याचं आयोजन हे नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधला. रोहितने या पत्रकार परिषदेत खेळपट्टीच्या वादावरुन प्रतिक्रिया दिली. रोहितची प्रतिक्रिया ऐकून कांगारुंना नक्कीच झोंबेल. नागपूर कसोटीआधी आपल्या सोयीने टीम इंडियाने खेळपट्टी तयार केल्याचा आरोप हा ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांकडून करण्यात आला होता.

व्हीसीएच्या खेळपट्टीत काहीच वाईट नसल्याचं मत रोहितचं आहे. फिरकीसाठी उपखंडीय खेळपट्टी फायदेशीर आहेत.मात्र त्यासाठी प्लाननुसार खेळणं गरजेचं असतं.ज्या खेळपट्ट्यांवर कांगारुंच्या फलंदाजांना टिकता आलं नाही, त्याच पीचपर रोहितने शतक ठोकलं. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 177 धावांवर ऑलआऊट झाली.

रोहित काय म्हणाला?

“अशा प्रकारच्या खेळपट्टीवर धावा करण्यासाठी अशी पद्धत वापरायला हवी जी पारंपरिक नसेल. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारच्या पीचवर खेळलोय, तिथे धावा करण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो तसेच प्लानिंगही असावी लागते”, असं रोहितने स्पष्ट केलं.

रोहित मुंबईच्या खेळपट्टीबाबत काय म्हणाला?

“मी मुंबईत खेळता खेळता मोठा झालोय, मुंबईची खेळपट्टी फार टर्न होते. तुम्हाला थोडं साचेबद्धपणे खेळायला नको. खेळताना पायाचा वापर करायला हवा. काहीतरी वेगळं करुन गोलंदाजांवर दबाव टाकण्याची गरज असते. या सर्व वेगळ्यापणात तुम्हाला शक्य ते करा, जसं की स्वीप शॉट, रिव्हर्स स्वीप मारा”, असंही रोहित म्हणाला.

दरम्यान टीम इंडियाने विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कॅप्टन रोहितसह फिरकी गोलंदाज या विजयाचे शिल्पकार ठरले. आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या तिकडीने टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

पहिल्या डावात अक्षर पटेल याने 84 आणि रवींद्र जडेजाने 70 धावा केल्या. आर अश्विनने 23 धावा जोडल्या. जडेजाने बॉलिंग करताना पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 7 विकेट्स घेतल्या. आर अश्विन याने दुसऱ्या डावात 5 आणि पहिल्या डावात 3 अशा एकूण 8 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल याने 1 विकेट घेतली.

दरम्यान मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमम्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड