AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशस्वी जयस्वालच्या रनआऊटमुळे वाद, अनुभवी खेळाडूचा पंचांवर आरोप, Video पाहा आणि तुम्हीच ठरला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात यशस्वी जयस्वालची द्विशतकाची संधी हुकली. यशस्वी जयस्वालचा डाव 175 धावांवर आटोपला. यशस्वी धावचीत होत तंबूत परतला. पण यात नेमकी चूक कोणाची? अनुभवी खेळाडूने पंचांवर थेट आरोप केला.

यशस्वी जयस्वालच्या रनआऊटमुळे वाद, अनुभवी खेळाडूचा पंचांवर आरोप, Video पाहा आणि तुम्हीच ठरला
यशस्वी जयस्वालच्या रनआऊटमुळे वाद, अनुभवी खेळाडूचा पंचांवर आरोप, Video पाहा आणि तुम्हीच ठरलाImage Credit source: video grab/X
| Updated on: Oct 11, 2025 | 5:52 PM
Share

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. वेस्ट इंडिज 140 धावांवर 4 गमावले आहेत. दरम्यान, भारताने पहिला डाव 5 गडी बाद 518 धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारताकडे अजूनही 378 धावांची आघाडी आहे. ही आघाडी मोडून काढणं वेस्ट इंडिजला कठीण जाणार आहे. दुसरीकडे, तिसऱ्या दिवशी झटपट विकेट काढाव्या लागणार आहेत. असं असताना दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात यशस्वी जयस्वाल धावचीत होत तंबूत परतला. खरं तर कसोटी सामन्यात धावचीत होणं हा क्रीडाप्रेमींच्या मते गुन्हा आहे. कारण तुमच्यावर चोरटी धाव घेण्याचं तसं काही दडपण नसतं. पण ही चूक यशस्वी जयस्वालला महागात पडली. 175 धावांवर असताना धावचीत झाला आणि तंबूत परतला. त्यामुळे द्विशतकाची संधी हुकली. पण रनआऊटची चर्चा रंगली आहे.

यशस्वीने मिड ऑफच्या दिशेने चेंडू मारला आणि धाव घेतली. पण शुबमन गिलने त्याला नकार दिला. त्यामुळे त्याला अर्ध्यातून परतावं लागलं. यात जयस्वाल धावचीत झाला. आता रनआऊट करताना विकेटकीपरच्या हाती चेंडू होता का यावरून वाद निर्माण झाला आहे. या निर्णयासाठी अनिल कुंबलेने पंचांना धारेवर धरलं आहे. दाद मागण्यासाठी पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे का सोपावला नाही. अनिल कुंबळे म्हणाले की, ‘चेंडू कीपरच्या पूर्णपणे नियंत्रणात नव्हता. त्यामुळे हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे जायला हवा होता. त्यामुळे आश्चर्य वाटलं. बेल्स उडवल्या तेव्हा चेंडू हातात होता की नाही याबाबत शंका होती.’

दुसरीकडे, यशस्वी धावचीत होण्यासाठी गिल जबाबदार होता का? असा प्रश्नही अनेक जण विचारत आहेत. अनिल कुंबळे यांनी सांगितलं की, ‘ही यशस्वी जयस्वालची चूक होती. कारण चेंडू थेट मि़ड ऑफच्या खेळाडूकडे गेला होता. त्यामुळे काहीच संधी नव्हती. त्याची खेळण्याची पद्धत आज थोडी वेगळी होती. मला वाटलं की पहिल्या दिवशीच्या माइंडसेटने येईल. पण तो काल संध्याकाळच्या माइंडसेटने उतरला होता. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं होतं. तो मोठ्या खेळीसाठी सेट झाला होता.’

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.