AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात करो या मरोची लढाई, असं असेल भारताचं गणित

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना 20 फेब्रुवारीला असणार आहे. पहिल्याच सामन्याच्या निकालावर भारताचं पुढचं भवितव्य ठरणार आहे. पहिलाच सामना भारतासाठी डोकेदुखी असणार आहे का आणि कसं ते जाणून घ्या.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात करो या मरोची लढाई, असं असेल भारताचं गणित
| Updated on: Feb 17, 2025 | 4:15 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. आठ संघांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली असून प्रत्येक संघ साखळी फेरीत तीन सामने खेळणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरी गाठायची असेल तर तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. भारताच्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ आहेत. भारताचे सर्व सामने दुबईत होणार असून पहिलाच सामना बांगलादेशशी होणार आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई असणार आहे. कारण या गटातील सर्वात दुबळा संघ म्हणून बांगलादेशकडे पाहिलं जात आहे. पण बांगलादेशने अनेकदा स्पर्धेत उलटफेर केला आहे. 2007 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत याची अनुभूती आली आहे. त्यामुळे भारताने बांगलादेशला क्रिकेटच्या मैदानात कमी लेखणं महागात पडू शकतं. भारताला उपांत्य फेरी गाठायची तर पहिल्याच सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. कारण त्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. या दोन संघांना सहज पराभूत करू अशी स्थिती नाही. त्यामुळे पहिल्याच सामन्यात भारताचं उपांत्य फेरीबाबत काय तो फैसला होणार आहे.

भारताने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला तर उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवलं तरी पुरेसं होईल. पण पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर मात्र भारताला उर्वरित दोन्ही सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. अन्यथा उपांत्य फेरीचं गणित सुटणार नाही. पहिला सामना गमवल्यानंतर भारताला उर्वरित दोन सामन्यात विजयाचं दडपण असेल. दडपणाखाली चांगला प्रदर्शन करणं कठीण होईल. त्यात न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची वाट कायम अडवली आहे. साखळी फेरीत भारताचा पहिला सामना बांगलादेशशी 20 फेब्रुवारीला, दुसरा सामना पाकिस्तानशी 23 फेब्रुवारीला आणि तिसरा सामना न्यूझीलंडशी 2 मार्चला होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

Follow Us
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.