AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशवर फिरकीपटू हरभजन सिंगने राग काढला, यायचं नसेल तर…

बांगलादेशमधील हिंसक स्थितीचे तीव्र पडसाद भारतात उमटले आहे. तिथल्या अत्याचाराची गंभीर दखल घेतली गेली आहे. त्यामुळेच बीसीसीआयने मुस्तफिझुर रहमान यांची आयपीएलमधून हकालपट्टी केली. आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही जशाच तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. यावर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने आपलं मत व्यक्त केलं आहे.

बांगलादेशवर फिरकीपटू हरभजन सिंगने राग काढला, यायचं नसेल तर...
बांगलादेशवर फिरकीपटू हरभजन सिंगने राग काढला, जर यायचं नसेल तर...Image Credit source: PTI/AFP
| Updated on: Jan 05, 2026 | 8:31 PM
Share

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यात कमालीचे ताणले गेले आहेत. क्रीडाविश्वावरही त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. बांगलादेशातील हिंसाचारानंतर आयपीएल स्पर्धेत भाग घेतलेल्या मुस्तफिझुर रहमान काढण्याचे आदेश बीसीसीआयने दिले. त्यानंतर या वादाचा आणखी भडका उडाला आहे. बांगलादेशनेही बीसीसीआयने उचललेल्या पावलांवर तीव्र आक्षेप घेतला ठआहे. इतकंच काय तर आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा भारतात खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून विनंतरी केली आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील बांगलादेशचे सामना भारताबाहेर करण्याची विनंती केली आहे. पण यावर आयसीसीने उत्तर दिलेलं नाही. पण असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने बांगलादेशला खडे बोल सुनावले आहेत.

एएनआय वेबसाईटवरील माहितीनुसार हरभजन सिंगने सांगितलं की, ‘मागच्या काही दिवसात झालेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे बांग्लादेश भारतात येऊ इच्छित नाही. बांगलादेशमध्ये जे काही घडलं ते वाईट आहे. आयसीसीने त्यांच्या मागणीचा विचार करायला हवा. आम्ही भारतात सर्वांचं स्वागत करतो. पण बांग्लादेश येथे येऊ इच्छित नाही. त्यांना येथे यायचं की नाही हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे.’ बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीला लिहिलेल्या पत्रानंतर हरभजन सिंगची वक्तव्य समोर आलं आहे. बीसीबीने औपचारिकपणे आयसीसीला पत्र लिहून टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सर्व सामने इतरत्र हलवण्याची विनंती केली आहे. बांगलादेशच्या मते त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत करावेत. शनिवारी झालेल्या आपतकालीन बैठकीनंतर बीसीबीने हा निर्णय घेतला.

बीसीसीआयने कोलकाता नाइट रायडर्सला मुस्तफिझुर रहमानला रिलीज करण्याचे आदेश दिले होते. कोलकात्याने आयपीएल मिनी लिलाव 2026 मध्ये 9.2 कोटींची बोली लावत संघात घेतलं होतं. बांगलादेशी खेळाडूला मिळालेली आतापर्यंत सर्वात मोठी रक्कम होती. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, हा निर्णय बांगलादेशातील सध्याच्या घटनांनंतर घेतला गेला आहे. इतकंच काय तर केकेआरला बदली खेळाडूची परवानगीही दिली आहे.

बांगलादेशात गेल्या वर्षापासून राजकीय अस्थिरता आहे. विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं होतं. त्या भारतात शरण आल्या आहेत. तेव्हापासून भारत आणि बांगलादेशचे संबंध ताणले गेले आहेत. दुसरीकडे, बांगलादेशमध्ये आयपीएल स्पर्धा टेलिकास्ट करण्यावर बंदी घातली गेली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...