AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्हाला काही धक्के लागणार…’ कोलंबो कसोटी सामन्यापूर्वी हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला?

कोलंबोतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. या मालिकेत आधीच 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता क्लिन स्विप देण्याचा मानस असणार आहे. असं असताना हेड कोच गौतम गंभीरच्या या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत.

'आम्हाला काही धक्के लागणार...' कोलंबो कसोटी सामन्यापूर्वी हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला?
'आम्हाला काही धक्के लागणार...' कोलंबो कसोटी सामन्यापूर्वी हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला?Image Credit source: PTI
| Updated on: Aug 22, 2026 | 6:37 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत भारतासाठी आता करो या मरोची लढाई आहे. प्रत्येक सामन्यात विजय नोंदवणं भाग आहे. तर आणि तरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा मिळणार आहे. त्यामुळे श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला असून दुसरा सामना जिंकून क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, हेड कोच गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताची करो या मरोची स्थितीत आल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण या साखळीत भारताने दक्षिण अफ्रिकेकडून घरच्या मैदानावर 0-2 ने पराभवाची धूळ चाखावी लागली होती. गौतम गंभीरने सूत्र हाती घेतल्यानंतर हा कसोटीतील दुसरा मोठा पराभव होता. त्यामुळे त्याला कार्यमुक्त करण्याची मागणीने जोर धरला होता. पण आता श्रीलंकेतील पहिला कसोटी सामना जिंकून टीम इंडिया योग्य ट्रॅकवर असल्याचं दाखवून दिलं आहे. असं असूनही गौतम गंभीरच्या मते टीम इंडियाला आणखी धक्के बसू शकतात.

काय म्हणाला गौतम गंभीर?

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितलं की, टीम संघर्ष नाही तर मागच्या एका वर्षापासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. हेड कोच गौतम गंभीर म्हणाला की, ‘आम्ही संघर्ष करत नाहीत, क्रमावारी काही महत्त्वाची नाही. आम्ही एका संक्रमणातून जात आहोत. आम्हाला मध्ये काही धक्के लागतील, पण आम्ही इंग्लंड दौऱ्यापासून सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट खेळत आहोत.’ दुसरीकडे, गौतम गंभीरने त्याच्यावर होत असलेल्या आरोपांवरही स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. गौतम गंभीर म्हणाला की, सोशल मीडियावर व्ह्यू आणि लाईकवर माझं लक्ष नाही तर टीम इंडियाला ट्रॉफी जिंकून देण्यावर आहे.

प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरवर कसोटी क्रिकेटमधील कामगिरीवर बराच दबाव असल्याचं दिसून येत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर हा दबाव काही अंशी कमी झाला आहे. गॉल कसोटी सामन्यात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. आता कोलंबो कसोटी जिंकून मालिका खिशात घालण्याचा मानस असेल. जर असं झालं तर गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाचा पहिला कसोटी मालिका विजय असेल. दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राउंडवर होत आहे. या सामन्यापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीर व्यक्त झाला.

Follow Us
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग