AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs AUSW : विजय मिळवल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर स्पष्टच म्हणाली….

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मात्र दुसर्‍या सामन्यात टीम इंडियाने कमबॅक केलं आहे. या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने मनोगत व्यक्त केलं आहे.

INDW vs AUSW : विजय मिळवल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर स्पष्टच म्हणाली....
INDW vs AUSW : विजय मिळवल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, 'गोष्टी गुंतागुतीच्या...'Image Credit source: PTI
| Updated on: Sep 17, 2025 | 10:45 PM
Share

भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव करून 1-1 अशी बरोबरी साधली आहे. वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या दृष्टीने या मालिकेकडे रंगीत तालीम म्हणून पाहीलं जात आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कमबॅक केलं आहे. या सामन्यातही स्मृती मंधानाने चमकदार कामगिरी केली. तिच्या शतकी खेळीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. भारतीय संघाने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 292 धावा केल्या आणि विजयासाठी 293 धावांचं आव्हान दिलं. मात्र पहिल्या सामन्यासारखं ऑस्ट्रेलियाला खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 40.5 षटकातच गारद झाला. ऑस्ट्रेलियाने फक्त 190 धावा केल्या. यासह भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 102 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ थेट वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत उतरणार आहे. त्यामुळे हा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे. या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने आपलं मत व्यक्त केलं.

हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘आज आम्ही चांगले क्रिकेट खेळलो याचा आम्हाला आनंद आहे. गेल्या टीम मीटिंगमध्ये आम्ही यावरच चर्चा केली होती की काहीही झाले तरी आम्ही आमच्या योजनांवर ठाम राहू आणि योग्य गोष्टी वारंवार करत राहू. निकाल आमच्या बाजूने मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही गोष्टी सोप्या आणि स्पष्ट ठेवण्याबद्दल बोलतो. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज असेल तेव्हा ते आम्हाला ब्रेकथ्रू देत आहे, ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करत राहू इच्छितो. आम्हाला स्मृतीकडून धावा मिळाल्या. पण इतरांनी धावा काढल्या नाहीत पण आम्ही 300 च्या जवळ पोहोचू शकलो. आम्ही याबद्दल बोलत राहतो, फलंदाजी करत राहतो, खेळपट्टीवर राहतो आणि आम्हाला नेहमीच त्या धावा मिळत राहतील कारण आता आमच्या फलंदाजीत खोली आहे.’

‘आमचे क्षेत्ररक्षण थोडेसे इकडे तिकडे होते. आम्ही काही संधी गमावल्या पण आमचे गोलंदाज आम्हाला संधी देत ​​राहिले आणि आम्ही त्याचा फायदा घेतला. या मालिकेत, आम्हाला प्रत्येकाला संधी द्यायची होती. आजच्या संयोजनामुळे आनंदी, प्रत्येकाने जबाबदारी घेतली आणि संघासाठी चांगले केले.’ , असंही हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.