AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी तुमच्या संघाला किती विजय आवश्यक? जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेतील 22 सामन्यांचा खेळ संपला आहे. आता पुढच्या टप्प्यात प्लेऑफची शर्यत आणखी तीव्र होणार आहे. दिल्ली वगळता कोणत्याच संघाने सलग विजयाची नोंद केलेली नाही. त्यामुळे आता प्लेऑफच्या शर्यतीत कोणते चार संघ जागा मिळवतील. तसेच कोणत्या संघाला किती विजय हवेत याचं गणित समजून घेऊयात.

IPL 2025 : प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी तुमच्या संघाला किती विजय आवश्यक? जाणून घ्या
आयपीएल 2025 कर्णधार
| Updated on: Apr 09, 2025 | 3:51 PM
Share

आयपीएल स्पर्धा आता मधल्या वळणावर आली आहे. मात्र अजूनही कोणत्याच संघाने प्लेऑफवर प्रबळ दावा दाखवला नाही. दिल्ली कॅपिटल्स वगळता प्रत्येक संघाने एखाद दुसरा सामना गमावला आहे. त्यामुळे अजूनही दहा संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं गणित कुशी बदलणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या स्पर्धेत किती सामने शिल्लक आहेत आणि पुढे किती सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचं गणित सुटेल? याचं गणित मांडलं जात आहे. त्यामुळे टॉप चारमध्ये राहण्याची धडपड सुरु झाली आहे. प्लेऑमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येक संघाला किमान 16 गुण मिळवणं आवश्यक आहे. म्हणजेच 14 पैकी 8 सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्या संघाला किती विजय मिळवणं भाग आहे, यावर गणित अवलंबून आहे. पण स्पर्धेत तुल्यबल सामने सामने झाले तर गणित नेट रनेरटवर अवलंबून असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 3 सामने खेळले असून 6 गुण मिळवले आहेत. अजूनही 11 सामने शिल्लक असून त्यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला तर 16 गुणांचं गणित सुटेल. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वाधिक संधी आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले असून तीन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पदरात 6 गुण पडले आहेत. आता 10 सामने शिल्लक असून 5 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तरच 16 गुणांचं गणित सुटेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सची स्थितीही गुजरात टायटन्ससारखी आहे. या संघांनी चार सामने खेळले असून तीन सामन्यात विजय मिळवला आहे. अजूनही 10 सामने खेळायचे असून पाच सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफचं गणित सुटणार आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सचेही 6 गुण आहेत. पण पाच सामने खेळले आहेत. त्यामुळे उर्वरित नऊ पैकी पाच सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या पारड्यात प्रत्येकी 4 गुण पडले आहेत. पण राजस्थान रॉयल्सकडे केकेआरच्या तुलनेत एक सामना अधिकचा आहे. म्हणजेच केकेआरने 5 सामने खेळले असून तीन सामन्यात पराभव तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 4 सामने खेळले असून दोन सामन्यात विजय, तर दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. केकेआरला उर्वरित 9 पैकी 6 सामन्यात, तर राजस्थानला 10 पैकी 6 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांची स्थिती नाजूक आहे. या तिन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या संघांच्या पारड्यात प्रत्येकी 2 गुण आहेत. त्यामुळे या संघांनी 16 गुणांचं गणित सोडवायचं म्हंटलं तर 9 पैकी 7 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे या संघांना आता पुढच्या प्रत्येक सामन्यात करो या मरोची लढाई आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय