AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc Champions Trophy 2025 : भारत-पाकिस्तान दोघांवर बंदी घाला, आयसीसीला कुणाचा सल्ला?

Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आल्याने बीसीसीआयचा टीम इंडियाला तिथं पाठवण्यास विरोध आहे.

Icc Champions Trophy 2025 : भारत-पाकिस्तान दोघांवर बंदी घाला, आयसीसीला कुणाचा सल्ला?
hardik pandya and muhammad rizwan ind vs pakImage Credit source: PTI
| Updated on: Nov 13, 2024 | 8:45 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यासाठी बीसीसीआय तयार नाही. तर यजमान पाकिस्तान भारतासाठी माघार घेण्यासाठी तयार नाही. या स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तानमध्ये करण्यात आल्याने भारताने सुरुवातीपासूनच तिथे जाऊन खेळण्यास नकार दर्शवला आहे. बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये सुरक्षिततेच्या कारणामुळे पाठवण्यासाठी तयार नाही. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान या स्पर्धेचं हायब्रिड पद्धतीने आयोजन करण्यासाठी तयार नाही. बीसीसीआय असो किंवा पीसीबी दोन्ही क्रिकेट बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कुणीही ‘बॅकफुटवर’ यायला तयार नाही. अशात पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी आयसीसीला सल्ला दिला आहे. आयसीसीने बीसीसीआय आणि पीसीबीवर बंदी घालायला हवी. तसेच दोघांनाही आयसीसी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळायला नको, असं लतीफने आयसीसीला म्हटलंय.

राशीद लतीफ काय म्हणाले?

“पाकिस्तान कदाचित टीम इंडियाविरुद्ध क्रिकेट न खेळण्याची अधिक शक्यता आहे. मी जर सत्तेत असतो तर मी हे मोठं पाऊल उचललं असतं. मी यासाठी कुणालाही जबाबदार ठरवणार नाही. टीम इंडियाला खेळायचं नसेल तर नका खेळू. मी पण आम्ही टीम इंडियाविरुद्ध खेळणार नाही, असं निर्णय घेतला असता”, असं राशिद लतीफ यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

आयसीसीला सल्ला

राशिद लतीफ यांनी यानंतर आयसीसीला अजब सल्ला दिला. “आयसीसीने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना कोणत्याही स्पर्धेच्या यजमानपदाचा मान देऊ नये. जोवर या दोन्ही देशांमधील संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत आयसीसीने ही भूमिका घ्यायला पाहिजे”, असंही राशिद लतीफ यांनी म्हटलं.

“आयसीसीने 2023 मध्ये श्रीलंका आणि झिंबाब्बेवर 2019 साली बंदी घातली होती. या दोन्ही देशाच्या क्रिकेट बोर्डात राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने ही कारवाई केली होती. पण भारत आणि पाकिस्तानवर बंदी का घातली जात नाही? कारण आयसीसीला भारत-पाकिस्तान यांच्याकडून सर्वात जास्त पैसा मिळतो”, असं लतीफ यांनी म्हटलं.

राशिद लतिफ काय काय म्हणाले?

“बीसीसीआयची चूक”

“यावेळेस बीसीसीआयची चूक आहे. कारण त्यांचं यावेळेस पाकिस्तानमध्ये न येण्यासाठीचं कारण हे ठोस नाही. पाकिस्तानमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असं बीसीसीआयने लेखी द्यायला हवं होतं. आयसीसीची सिक्योरिटी टीम पाकिस्तानमध्ये आली होती. त्यांनी पाकिस्तान खेळण्यासाठी सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. जर बीसीसीआयला कसलीही भीती होती तर त्यांनी आयसीसीला आधी सांगायला हवं होतं”, असंही राशिद लतीफ यांनी म्हटलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.