AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रक जाहीर होताच पाकिस्तानची धाकधूक वाढली, भारताने अंतिम फेरी गाठली तर..

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं अधिकृत वेळापत्रक अखेर समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेली आडमुठी भूमिका अखेर सोडावी लागली आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर होणार आहे. असं असताना या स्पर्धेच्या अंतिम फेरीआधीच पाकिस्तानची धाकधूक वाढली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रक जाहीर होताच पाकिस्तानची धाकधूक वाढली, भारताने अंतिम फेरी गाठली तर..
| Updated on: Dec 24, 2024 | 8:05 PM
Share

आयसीसीने पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आता दीड महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पहिलाच सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. साखळी फेरीचे 19 फेब्रुवारीपासून 2 मार्चपर्यंत सलग होणार आहेत. 4 आणि 5 मार्चला उपांत्य फेरीचे सामने होतील. तर अंतिम फेरीचा सामना 9 मार्चला होणार असून 10 मार्च हा दिवस राखीव ठेवला आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशची 20 फेब्रुवारीला होणार आहे. असं सर्व काही असताना पाकिस्तानचं टेन्शन अंतिम फेरीपूर्वी वाढलं आहे. पाकिस्तानच्या आयोजन एका झटक्यात पाण्यात जाऊ शकतं. यासाठी भारताला अंतिम फेरी गाठणं आवश्यक आहे. नेमकं असं काय झालं की पाकिस्तानची अवस्था बिकट होईल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण 8 संघ आहेत. अ गटात पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ आहेत. तर ब गटात दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे संघ आहेत.

साखळी फेरीत भारताचे पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध सामने होणार आहेत. भारत या संघाशी साखळी फेरीत प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. हे सर्व सामने दुबईत होणार आहेत. त्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना दुबईत होईल. तर दुसरा सामना लाहोरमध्ये होणार आहे. इथपर्यंत सर्व काही ठीक आहे. खरं तर उपांत्य फेरीत भारत पाकिस्तान सामना होणार नाही. कारण दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत दोन्ही संघ पोहोचल्यानंतर आमनेसामने येणार नाहीत. पण दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली तर पाकिस्तानची गोची होईल. कारण हा सामना दुबईत होईल.

आयसीसीने वेळापत्रक जाहीर करतानाच अंतिम फेरीबाबत सर्वकाही स्पष्ट केलं आहे. अंतिम फेरीचा सामना लाहोरमध्ये होईल. पण भारताने अंतिम फेरी गाठली तर हा सामना दुबईत होईल. मग अंतिम फेरीत पाकिस्तानचा संघ असला तरी तसंच असेल. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मोठं नुकसान होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक

  • 19 फेब्रुवारी: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची, पाकिस्तान
  • 20 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
  • 21 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची, पाकिस्तान
  • 22 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर, पाकिस्तान
  • 23 फेब्रुवारी: पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
  • 24 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी, पाकिस्तान
  • 25 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी, पाकिस्तान
  • 26 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर, पाकिस्तान
  • 27 फेब्रुवारी: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी, पाकिस्तान
  • 28 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर, पाकिस्तान
  • 1 मार्च: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची, पाकिस्तान
  • 2 मार्च: न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
  • 4 मार्च: सेमीफायनल 1, दुबई
  • 5 मार्च: सेमीफायनल 2, लाहोर, पाकिस्तान
  • 9 मार्च: फायनल, लाहोर (भारत पात्र ठरला तर दुबईमध्ये खेळला जाईल)
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.