AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वचषकातील कामगिरीनंतर ICC ने जाहीर केला टी20 संघ, एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही

यंदाची विश्वचषक स्पर्धा भारतासाठी अत्यंत खराब ठरली. स्पर्धेच्या सुरुवातीला दोन मोठ्या पराभवामुळे भारत पुन्हा स्पर्धेत पुनरागमन करु शकला नाही. ज्यामुळे सेमीफायनलपूर्वीच भारत स्पर्धेबाहेर गेला.

विश्वचषकातील कामगिरीनंतर ICC ने जाहीर केला टी20 संघ, एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही
भारतीय क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 4:42 PM
Share

T20 World Cup 2021: यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2021) नुकताच पार पडला. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला मात देत विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. दरम्यान या संपूर्ण स्पर्धेत एक ताकदवर संघ असतानाही भारताची कामगिरी मात्र फारच खराब राहिली. सेमीफायनलपूर्वीच स्पर्धेबाहेर गेलेल्या भारताच्या एकाही खेळाडूला स्पर्धेत छाप सोडता आली नाही. याचाच परिणाम म्हणून आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम 12 खेळाडूंमध्ये भारताचा एकही खेळाडू नसल्याचं दिसून आलं.

आयसीसीने जाहीर केल्लाय या संघाचा कर्णधार म्हणून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचं नाव असून यष्टीरक्षक  म्हणून जोस बटलरचं नाव आहे. याशिवाय डेव्हिड वॉर्नरला बटलरसोबत सलामीवीर म्हणून निवडण्यात आलं आहे. तर त्यानंतर बाबर आझम, चारिथ अस्लंका,  एडन मार्कराम आणि सहाव्या स्थानावर इंग्लंडचा मोईन अली अशी नावं आहेत. तर गोलंदाजीमध्ये श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा आणि अॅडम झाम्पा यांच्यासह वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड आणि ट्रेंट बोल्टसह ए. नॉर्खिया यांची नावं आहेत. तर 12 वा खेळाडू म्हणून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचं नाव आहे.

अशी आहे आयसीसी टी 20 वर्ल्ड कप प्लेइंग 11- डेव्हिड वॉर्नर, जोस बटलर, बाबर आझम, चारिथ अस्लंका, एडन मार्कराम, मोईन अली, वानिंदु हसरंगा, अॅडम झम्पा, जोस हेझलवूड, ट्रेंट बोल्ट, अॅनरिक नॉर्खिया, शाहीन आफ्रिदी.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

भारताची विश्वचषकातील कामगिरी

भारताची स्पर्धेतील सुरवातच खराब झाली. आधी पाकिस्तानकडून 10 विकेट्सनी नंतर न्यूझीलंडकडून 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं होतं. त्यानंतरचे सर्व सामने जिंकूनही भारताला इतर संघाच्या पराभवावर पुढील फेरीत जाणं अवंलंबून होतं. भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया यांना नमवलं खरं, पण न्यूझीलंडने अधिक विजय मिळवल्यामुळे ते सेमीफायनलमध्ये पोहोचले आणि भारताचं स्पर्धेतील आव्हान संपलं.

इतर बातम्या

हार्दीक पंड्याच्या अडचणी वाढल्या, संघातून बाहेर झाल्यानंतर आता 5 कोटींची 2 घड्याळंही जप्त

Video: विश्वचषक जिंकताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच अजब सेलिब्रेशन, बुटातून घेतला ड्रिंक्सचा आस्वाद, नेमकं कारण काय?

भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

(ICC Most valuable player t20 announced not single indian player in team)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.