AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s World Cup 2022: बांगलादेशच्या पोरींचं वादळ, पाकिस्तान नेस्तनाबूत, 5 धावांत 5 विकेट्स घेत विजयी सलामी

आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेत बांगलादेशविरुद्धही (Bangladesh) पाकिस्तानला (Pakistan) विजय मिळवणे शक्य झाले नाही. बांगलादेशी महिलांनी पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेत आपले विजयाचे खाते उघडले.

Women’s World Cup 2022: बांगलादेशच्या पोरींचं वादळ, पाकिस्तान नेस्तनाबूत, 5 धावांत 5 विकेट्स घेत विजयी सलामी
Bangladesh Women’s Team (PAK W vs BAN W) Image Credit source: ICC
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 14, 2022 | 11:28 AM
Share

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेत बांगलादेशविरुद्धही (Bangladesh) पाकिस्तानला (Pakistan) विजय मिळवणे शक्य झाले नाही. बांगलादेशी महिलांनी पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेत आपले विजयाचे खाते उघडले. बांगलादेशच्या महिला संघाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानवर पहिला विजय नोंदवला. दुसरीकडे, पाकिस्तानला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांची सर्वात मोठी धावसंख्या उभारली, जी पाहून पाकिस्तानचा संघ फलंदाजीसाठी आल्यावर पहिल्या चेंडूपासून दबावात होती. परिणामी पाकिस्तानला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.

बांगलादेशने पाकिस्तानचा 9 धावांनी पराभव केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 234 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला 50 षटकांत 9 फलंदाजांच्या बदल्यात केवळ 225 धावा करता आल्या. 234 धावांपूर्वी, बांगलादेशची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या 211 धावा इतकी होती, जी त्यांनी 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना केली होती.

5 धावांत 5 बळी घेत बांगलादेशची पाकिस्तानवर मात

बांगलादेशच्या वनडेतील सर्वात मोठ्या धावसंख्येसमोर पाकिस्तानने आपल्या डावाची चांगली सुरुवात केली होती. या स्पर्धेत पहिल्यांदाच त्यांच्या सलामीच्या जोडीमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. 42 व्या षटकात 183 धावा झाल्या. म्हणजेच विजय आता 52 धावा दूर होता, त्या करण्यासाठी 7 विकेट्स आणि 8 षटके शिल्लक होती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खेळपट्टीवर सेट झालेली फलंदाज सिद्रा अमीन क्रीझवर होती. त्यामुळे हा सामना पाकिस्तानचा संघ सहज जिंकेल असे सर्वांना वाटत होते.

पण इतकं सगळं पाकिस्तानच्या बाजूने असूनही पुढच्या 13 चेंडूंमध्ये असं काही घडतं, ज्यामुळे सामन्याचं दृश्यच बदलून जातं. पाकिस्तानची मधली फळी अचानक कोलमडली. 183 धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर 188 धावांपर्यंत पाकिस्तानच्या 7 विकेट्स गेल्या होत्या. म्हणजेच 13 चेंडूत केवळ 5 धावांवर 5 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. मधली फळी उद्ध्वस्त झाल्यानंतर पाकिस्तानच्या हातून सामना निसटला. बांगलादेशने त्यांच्या आणखी दोन विकेट्स घेतल्या आणि त्यांच्या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

इतर बातम्या

ICC WWC 2022: पुरुषांनाही लाजवतील असे दोन झेल आणि रनआऊट, ‘या’ महिला क्रिकेटपटूंनी अचाट कामगिरी, पहा VIDEO

ICC WWC 2022: न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवून ऑस्ट्रेलियाची विजयी हॅट्ट्रिक

IND W vs WI W: मिताली राज, स्मृती मानधना जबाबदारी कधी घेणार? कोच रमेश पोवार म्हणाले…

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली