AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : पावसाने भारताच्या विजयाचा घास हिसकावला, बांगलादेश विरुद्धचा सामना रद्द

India Women vs Bangladesh Women Match Result : वनडे वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र हा सामना पावसाने जिंकला.

IND vs BAN : पावसाने भारताच्या विजयाचा घास हिसकावला, बांगलादेश विरुद्धचा सामना रद्द
IND vs BAN Womens RainImage Credit source: Bcci
| Updated on: Oct 26, 2025 | 11:34 PM
Share

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना हा पावसामुळे अखेर रद्द करावा लागला आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने होते. दोन्ही संघांचा हा सातवा आणि शेवटचा सामना होता. टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची 100 टक्के संधी होती. भारताने हा सामना जिंकलाच होता. मात्र पावसाला भारताचा पाचवा विजय पाहावला नाही. पावसाने सातत्याने सामन्यात विघ्न घातलं.त्यामुळे अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारे हा सामना रद्द झाला.

वर्ल्ड कप स्पर्धेतील 28 व्या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पावसाने सामन्यात सुरुवातीपासूनच खोडा घातला. त्यामुळे टॉसला विलंब झाला. भारताने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पावसामुळे 35 मिनिटं विलंबाने टॉस झाला. त्यानंतर पावसामुळे काही तास वाया गेले. त्यामुळे सामना 43 ओव्हरचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पावसाने पुन्हा खोडा घातला. पाऊस मनसोक्त बरसला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर सामना 27 ओव्हरचा करण्यात आला. बांगलादेशने 27 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 119 धावा केल्या.

बांगलादेशसाठी शर्मीन अक्टर हीने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर शोभना मोस्त्री हीने 26 रन्स केल्या. त्याव्यतिरिक्त एकीलाही 20 पार पोहचता आलं नाही. भारतासाठी राधा यादव हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. श्री चरणी हीने दोघींना आऊट केलं. तर रेणुका सिंह ठाकुर, दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. भारताला विजयासाठी 120 धावांचं आव्हान अपेक्षित होतं. मात्र भारताला डीएलएसनुसार 126 धावांचं सुधारित आव्हान मिळालं.

महिला ब्रिगेडची वादळी सुरुवात

भारताची विजयी धावांचा पाठलाग करताना कडक सुरुवात झाली होती. प्रतिका रावल आणि अमनजोत कौर या सलामी जोडीने तडाखेदार सुरुवात केली.त्यामुळे भारत हा सामना 10 विकेट्सनेच जिंकणार, असं चित्र होतं. मात्र पावसाला सामना निकाली निघतोय, हे खटकलं असावं. त्यामुळे पावसाने भारताची बॅटिंग रोखत स्वत:ची बॅटिंग सुरु केली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. भारताने खेळ थांबवण्यात आला तोवर 8.4 ओव्हरमध्ये बिनबाद 57 रन्स केल्या होत्या. स्मृती 34 आणि अमनजोत 15 रन्सवर नॉट आऊट होत्या.

…आणि सामना रद्द

भारताला आता काहीच धावांची गरज होती. मात्र बराच वेळ पाऊस थांबण्याची आणि खेळपट्टी कोरडी होण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र सर्वकाही नियंत्रणाबाहेर गेल्याचं लक्षात येताच सामना रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. अशाप्रकारे बांगलादेश पराभवापासून वाचली. तर पावसाने भारताचा विजय हिसकावला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...