AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : पावसाने भारताच्या विजयाचा घास हिसकावला, बांगलादेश विरुद्धचा सामना रद्द

India Women vs Bangladesh Women Match Result : वनडे वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र हा सामना पावसाने जिंकला.

IND vs BAN : पावसाने भारताच्या विजयाचा घास हिसकावला, बांगलादेश विरुद्धचा सामना रद्द
IND vs BAN Womens RainImage Credit source: Bcci
| Updated on: Oct 26, 2025 | 11:34 PM
Share

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना हा पावसामुळे अखेर रद्द करावा लागला आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने होते. दोन्ही संघांचा हा सातवा आणि शेवटचा सामना होता. टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची 100 टक्के संधी होती. भारताने हा सामना जिंकलाच होता. मात्र पावसाला भारताचा पाचवा विजय पाहावला नाही. पावसाने सातत्याने सामन्यात विघ्न घातलं.त्यामुळे अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारे हा सामना रद्द झाला.

वर्ल्ड कप स्पर्धेतील 28 व्या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पावसाने सामन्यात सुरुवातीपासूनच खोडा घातला. त्यामुळे टॉसला विलंब झाला. भारताने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पावसामुळे 35 मिनिटं विलंबाने टॉस झाला. त्यानंतर पावसामुळे काही तास वाया गेले. त्यामुळे सामना 43 ओव्हरचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पावसाने पुन्हा खोडा घातला. पाऊस मनसोक्त बरसला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर सामना 27 ओव्हरचा करण्यात आला. बांगलादेशने 27 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 119 धावा केल्या.

बांगलादेशसाठी शर्मीन अक्टर हीने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर शोभना मोस्त्री हीने 26 रन्स केल्या. त्याव्यतिरिक्त एकीलाही 20 पार पोहचता आलं नाही. भारतासाठी राधा यादव हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. श्री चरणी हीने दोघींना आऊट केलं. तर रेणुका सिंह ठाकुर, दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. भारताला विजयासाठी 120 धावांचं आव्हान अपेक्षित होतं. मात्र भारताला डीएलएसनुसार 126 धावांचं सुधारित आव्हान मिळालं.

महिला ब्रिगेडची वादळी सुरुवात

भारताची विजयी धावांचा पाठलाग करताना कडक सुरुवात झाली होती. प्रतिका रावल आणि अमनजोत कौर या सलामी जोडीने तडाखेदार सुरुवात केली.त्यामुळे भारत हा सामना 10 विकेट्सनेच जिंकणार, असं चित्र होतं. मात्र पावसाला सामना निकाली निघतोय, हे खटकलं असावं. त्यामुळे पावसाने भारताची बॅटिंग रोखत स्वत:ची बॅटिंग सुरु केली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. भारताने खेळ थांबवण्यात आला तोवर 8.4 ओव्हरमध्ये बिनबाद 57 रन्स केल्या होत्या. स्मृती 34 आणि अमनजोत 15 रन्सवर नॉट आऊट होत्या.

…आणि सामना रद्द

भारताला आता काहीच धावांची गरज होती. मात्र बराच वेळ पाऊस थांबण्याची आणि खेळपट्टी कोरडी होण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र सर्वकाही नियंत्रणाबाहेर गेल्याचं लक्षात येताच सामना रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. अशाप्रकारे बांगलादेश पराभवापासून वाचली. तर पावसाने भारताचा विजय हिसकावला.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं