AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला टेन्शन त्या ’12 चेंडूचं’, गोलंदाजीचं गणित फारचं अवघड

भारताने दोन्ही सराव सामने जिंकले असले तरी सर्वाधिक चिंता ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याची आहे. विश्वचषकातील पहिला सामना असण्यासोबतच पाकिस्तान विरुद्धचा सामना म्हणजे खेळाडूंवर वेगळाच तणाव असतो. अशावेळी गोलंदाजांचं गणितही थोडं अवघड झालं आहे.

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला टेन्शन त्या '12 चेंडूचं', गोलंदाजीचं गणित फारचं अवघड
भारतीय क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 4:25 PM
Share

दुबई: एकीकडे टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup) सुरुवात झाली आहे.  ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार सुरु असला तरी अनेकांचे खासकरुन भारत आणि पाकिस्ता देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष 24 ऑक्टोबर या तारखेकडे लागले आहे. सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु झाल्यानंतर भारतीय संघाचा पहिला सामना 24 तारखेला पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. विश्वचषकातील पहिल्याच आणि त्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघ रणनीती करण्यात व्यस्त असून नेमके अंतिम 11 खेळाडू कोण असतील? या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे.

दोन्ही सराव सामन्यात भारताने फलंदाजीने समोरच्या टीमला सळो की पळो केलं. त्यामुळे फलंदाजीचा तसा मोठा प्रश्न नाही. पण गोलंदाजीमध्येच भारतीय संघाला थोडा विचार करावा लागणार आहे. कारण टी20 सामन्यामध्ये 5 मुख्य गोलंदाद असले तरी एक अधिकचा पर्याय 6 वा गोलंदाज म्हणून लागतो. याचे कारण 5 पैकी 1 गोलंदाज खराब फॉर्ममध्ये असतोच. कधी आणखी एक गोलंदाजही खराब फॉर्ममध्ये असल्यास 6 वा गोलंदाज अनिवार्य होतो. सध्या भारत 3 वेगवान आणि 2 फिरकीपटूंचा विचार करत आहे.यामध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि वरुण चक्रवर्ती किंवा आर आश्विन यांच्यातील एकजण असे 5 गोलंदाज असतील.  त्यात भारताचा अष्टपैलू हार्दीक गोलंदाजी करत नसल्याने भारतासमोर 6 व्या गोलंदाजाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विराट कोहली पर्याय?

वरील प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने विराट कोहलीकडून दोन ओव्हर देखील टाकून घेतल्या. विराटने देखील केवळ 12 धावाच दिल्या. पण हा एक सराव सामना असल्याने मुख्य सामन्यात मात्र विराटला गोलंदाजी देताना आणखी विचार करणे गरजेचे आहे. विराटने मुख्य सामन्यात 2 ओव्हर टाकून त्यात कमीत कमी धावा दिल्या तरी भारतीय संघाचा हा प्रश्न सुटु शकतो.

भुवनेश्वर आणि राहुलवर टांगती तलवार

भारतीची गोलंदाजी ही पूर्वीपासून एक समस्या आहे. अलीकडे अव्वल दर्जाचे गोलंदाज संघात असले तरी नेमका कोणता खेळाडू कधी फॉर्ममध्ये आहे? असे प्रश्न आहेतच. त्यात सध्या टी20 संघात स्थान देण्यात आलेले गोलंदाज राहुल चाहर आणि भुवनेश्वर कुमार हे खास लयीत दिसत नाहीत. अनुभवी भुवीला स्वींग जमत नसून त्याने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात बऱ्याच धावा खालल्या. 4 षटकात 54 धावा देत त्याने एकही विकेट घेतला नाही. तर दुसरीकडे युझवेंद्र चहलच्या जागी संघात आलेल्या राहुल चाहरनेही 4 षटकात 43 धावा देत केवळ एकच विकेट घेतली. त्यामुळे या दोघांना संघात कायम राहण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करणं अनिवार्य आहे.

इतर बातम्या

ठरलं की, आपला मुंबईकर रोहीत टीम इंडियाचा कॅप्टन होणार, T20 World Cup नंतर घोषणा

फिल्डिंग कोच आर. श्रीधरच्या जागी ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची वर्णी?, T20 World Cup नंतर होणार घोषणा

T20 World Cup 2021: श्रीलंकेचा आयर्लंडवर दमदार विजय, सुपर 12 मध्ये दणक्यात एन्ट्री

(In india vs pakistan match which 6th bowler should team india will choose main question fot big event)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…