AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिल्डिंग कोच आर. श्रीधरच्या जागी ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची वर्णी?, T20 World Cup नंतर होणार घोषणा

सध्या भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर (Coach R Sridhar) हे विश्वचषकानंतर पदावरुन पायउतार होणार असल्याने त्याजागी आता नव्या व्यक्तीची नेमणूक करण्याचं काम सुरु आहे.

फिल्डिंग कोच आर. श्रीधरच्या जागी 'या' माजी भारतीय क्रिकेटपटूची वर्णी?, T20 World Cup नंतर होणार घोषणा
आर श्रीधर धोनीसह
| Edited By: | Updated on: Oct 20, 2021 | 11:56 PM
Share

मुंबई: सध्या सुरु असलेल्या टी20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) अनेक बदल होणार आहेत. यात सर्वात मोठा बदल म्हणजे भारतीय संघाचे प्रशिक्षक बदलणार असून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसह (Ravi Shastri) इतर कोचिंग स्टाफही बदलणार आहे. तसंच विराट कोहली (Virat Kohli) हा देखील टी20 कर्णधारपद सोडणार आहे. दरम्यान शास्त्रींसह कोचिंग स्टाफमध्ये फिल्डिंग कोच असणारे आर. श्रीधर (Coach R Sridhar) हे देखील पदावरुन पायउतार होणार असल्याने त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची नेमणूक करण्याचे काम सध्या सुरु आहे.

याजागी माजी क्रिकेटपटू अभय शर्मा (Abhay Sharma) यांनी अप्लाय केलं असून ते श्रीधर यांची जागा घेण्याची शक्यता आहे. शर्मा यांनी भारत ए, भारत अंडर-19 आणि राष्ट्रीय महिला संघासोबत काम केलं आहे. दरम्यान श्रीधर यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार असून त्यावेळी 52 वर्षीय अभय यांना भारतीय क्रिकेट संघासोबत फील्डिंग कोच म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

संघ सोडताना आर श्रीधर भावूक

आर. श्रीधर विश्वचषकानंतर राजीनामा देणार असल्याने त्यांनी संघापासून वेगळं होण्याआधी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. श्रीधर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर लिहिलेल्या भल्यामोठ्या पोस्टमध्ये सर्वांचे आभार मानत त्यांच प्रशिक्षक म्हणूनचा कार्यकाळ शब्दात रेखाटला आहे. श्रीधर हे 2014 साली भारतीय संघासोबत फिल्डिंग कोच म्हणून जॉईन झाले. तेव्हापासून आतापर्यंत ते संघासोबत असून सध्या सुरु असलेल्या टी20 विश्वचषकानंतर रवी शास्त्रींसोबतच ते देखील संघाला राम राम करणार आहेत.

श्रीधर यांनी त्यांच्या भावनिक पोस्टमध्ये स्वत:चा मैदानावरील फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, ‘2014 ते 2021  या काळात संघाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल BCCI चं धन्यवाद. मी संपूर्ण मेहनतीने माझं काम केलं आहे. यावेळी माझ्याकडून काही चूका झाल्याही असतील तरी आज संघ एका चांगल्या स्थानावर विराजमान आहे.’ पुढे त्यांनी अनेकांचे आभार मानले यात रवी शास्त्रींचे आभार मानाता ‘मी कायम त्यांचा ऋणी राहिन.’ असंही त्यांनी लिहिलं. तर दोन्ही कर्णधार धोनी आणि विराट कोहली यांचही खूप-खूप धन्यवाद. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. असंही त्यांनी लिहिलं सोबतच अजिंक्य रहाणे, रोहित शर्मासह यांच्यासह सर्व खेळाडू  अनिल कुंबळे, संजय बांगर, विक्रम राठोर, भरत अरुण इत्यांदीचंही धन्यवाद या पोस्टमध्ये श्रीधर यांनी केलं आहे.

हे ही वाचा-

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा उत्साह शिगेला, एक आव्हान पूर्ण करताच भारताचा विजय पक्का

T20 World Cup मधील बांग्लादेशचं आव्हान कायम, ओमानवर 26 धावांनी विजय

T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

(Indian Cricketer Abhay sharma may take place as team indias fielding coach on poistion of R Sridhar)

Follow Us
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?