IPL 2021: इशानचं तुफानी अर्धशतक, मुंबईचा दणकेबाज विजय, राजस्थानला 8 गडी राखून दिली मात

इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघातील सामन्यात मुंबईने दमदार खेळाचे प्रदर्शन घडवले. मुंबईने राजस्थानवर 8 गडी राखून धडाकेबाज विजय मिळवला आहे.

IPL 2021: इशानचं तुफानी अर्धशतक, मुंबईचा दणकेबाज विजय, राजस्थानला 8 गडी राखून दिली मात
इशान किशन
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 10:39 PM

IPL 2021: आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 51 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI)  या दोन संघामध्ये पार पडला. प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चौथ्या संघाचं स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचा असणारा हा सामना जिंकत मुंबईने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. तसंच गुणतालिकेतही झेप घेत थेट पाचवं स्थान मिळवलं आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी निवडली. हा निर्णय मुंबईसाठी 100% बरोबर ठरला. मुंबईच्या गोलंदाजानी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला अवघ्या 90 धावांवर रोखलं. ज्यामुळे मुंबईसमोर केवळ 91 धावांचे सोपे लक्ष्य होते. जे त्यांनी अवघ्या 8.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावत पूर्ण केले. यावेळी संघाचा सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज असं अर्धशतक झळकावत मुंबईचा विजय सोपा केला.

राजस्थानची फलंदाजी ढासळली

सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाने त्यांचे यंदाच्या पर्वातील सर्वात खराब फलंदाजीचे दर्शन घडवले. संपूर्ण संघ मिळून 20 षटकात केवळ 90 धावाचं करु शकला. संघाकडून सर्वाधिक धावा म्हणजे सलामीवीर एविन लुईसने केलेल्या 24 धावा ठरल्या. तो बाद झाल्यानंतर एकही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. कर्णधार संजूही आज 3 धावा करुन बाद झाला. तर श्रेयस गोपाल, कुलदिप यादव हे तर शून्य धावांवर बाद झाले. लुईसशिवाय यशस्वी (12), मिलर (15) आणि तेवतिया (12) यांनी काही धावा केल्या. इतर फलंदाज दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. मुंबईकडून मात्र उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. नथान कुल्टर नाईलने 4, जेम्स नीशामने 3 आणि बुमराहने 2 विकेट्स घेतले.

इशानचं धडाकेबाज अर्धशतक आणि मुंबई विजयी

91 धावांचं सोपं लक्ष्य पार करताना मुंबईचा सलामीवीर कर्णधार रोहितने चांगली सुरुवात केली. पण 22 धावा होताच चेतन सकारियाने त्याला बाद केलं. त्यानंतर सूर्यकुमारही 13 धावा करुन बाद झाला. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली. पण सलामीवीर इशान किशन मात्र एका बाजूने तुफानी फलंदाजी करतच होता. त्याने अवघ्या 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत 50 धावा केल्या आणि सोबतच मुंबईला अवघ्या 8.2 ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.

चौथ्या स्थानासाछी केकेआर आणि मुंबईत चुरस

सध्या केकेआर आणि मुंबई दोघांनी 13 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. पण केकेआरचा नेट रनरेट +0.294 असून मुंबईचा -0.048 इतका आहे. त्यामुळे केकेआर चौथ्या आणि मुंबई पाचव्या स्थानावर आहे. यामुळेच दोन्ही संघाचा अखेरचा सामना अत्यंत महत्त्वाचा असून केकेआरचा सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्ससोबत तर मुंबईचा शुक्रवारी सनरायजर्स हैद्राबादसोबत होणार आहे.

हे ही वाचा 

T20 world Cup ला मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती मुकणार?, दुखापतीनंतरही आयपीएलमधून माघार नाहीच, काय आहे नेमकं प्रकरण?

T20 world Cup 2021 पूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर IPL मध्ये दुखापतग्रस्त, विश्वचषकालाही मुकणार

उत्तम T20 क्रिकेटर व्हायचंय?, कोहली किंवा गेलला नाही तर ‘या’ खेळाडूला फॉलो करा, माजी इंग्लंड कर्णधाराचा युवांना सल्ला

(In MI vs RR match Mumbai Indian won Match against Rajsthan Royals with 8 wickets in Hands)

Non Stop LIVE Update
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.