Ind vs Aus 2nd T20: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर पलटवार, रोहितची तुफान बॅटिंग, जाणून घ्या विजयाची कारणं

Ind vs Aus 2nd T20: 8 ओव्हरच्या मॅचमध्ये टीम इंडियाने अशी मारली बाजी. या खेळाडूंची विजयात महत्त्वाची भूमिका.

Ind vs Aus 2nd T20: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर पलटवार, रोहितची तुफान बॅटिंग, जाणून घ्या विजयाची कारणं
ind vs ausImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 7:09 AM

मुंबई: टीम इंडियाने शुक्रवारी दुसऱ्या T20 सामन्यात बाजी मारली. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच झाली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट राखून विजय मिळवला. तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने आता 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पावसामुळे सामना सुरु व्हायला बराच विलंब झाला. अखेर अंपायर्सनी मैदानाची पाहणी करुन 8 ओव्हर्सची मॅच खेळवण्याचा निर्णय घेतला.

–  प्रथम बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने 8 ओव्ह्रर्समध्ये 90 धावा केल्या. टीम इंडियाला विजयासाठी 91 धावांच लक्ष्य दिलं. टीम इंडियाने चार चेंडू राखून विजय मिळवला. जाणून घेऊया टीम इंडियाच्या विजयाची कारणं.

– टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला. त्याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मैदान आणि खेळपट्टीची स्थिती लक्षात घेता, या मॅचमध्ये टॉसची भूमिका महत्त्वाची होती. जिथे नशिबाची साथ टीम इंडियाला मिळाली.

– अक्षर पटेलने शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करता आली नाही. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देत होती. रोहितने अक्षरला सलग दोन ओव्हर गोलंदाजी दिली. अक्षरने दोन ओव्हर्समध्ये 13 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोठे फटके खेळू दिले नाहीत.

– 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. रोहित शर्माने टीमला तशी सुरुवात करुन दिली. रोहित शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून होता. त्याने नाबाद 46 धावा केल्या. टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

– ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची रोहितने चांगलीच धुलाई केली. षटकारांचा पाऊस पाडला. टीम इंडियाच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा वसूल केल्या. ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी शॉर्ट पीच चेंडूंचा मारा केला. योग्य लाइन लेंग्थची कमतरता दिसून आली.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.