AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्ग राजावर टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून! अन्यथा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी विसरा

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताची पुरती वाट लागली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पदरी निराशा पडली. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.

निसर्ग राजावर टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून! अन्यथा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी विसरा
| Updated on: Dec 16, 2024 | 1:07 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना पूर्णपणे कांगारुंच्या पारड्यात झुकलेला आहे. त्यामुळे आता भारताचं भवितव्य पूर्णत: पावसावर म्हणजेच निसर्ग राजावर अवलंबून आहे. कारण हा सामना ड्रॉ झाला तर काही अंशी भारताच्या अंतिम फेरीच्या आशा पल्लवित राहतील. भारताकडून आघाडीचे फलंदाज सपशेल फेल ठरले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात मिचेल स्टार्कला डिवचणाऱ्या यशस्वी जयस्वालला स्पीड काय असतो ते दाखवून दिलं आहे. डे नाईट कसोटीत पिसं काढल्यानंतर गाबा कसोटीतही स्टार्कचा बळी ठरला आहे. त्याला फक्त 4 धावा करता आल्या. दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. क्रीडाप्रेमींनी रोहित शर्माच्या कर्णधारपदात घेतलेल्या निर्णयावर टीकास्त्र सोडलं आहे. डे नाईट कसोटी नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय असो की गाबा कसोटीतील निर्णय.. दोन्ही वेळेस भारताला त्याचा फटका बसला आहे. जसप्रीत बुमराहाच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे अपेक्षा वाढल्या होत्या. रोहित शर्माच्या नेतृत्वात ही लय कायम राहील असं वाटत होतं. पण पुन्हा एकदा तसंच झालं आहे. डे नाईट कसोटी सामना गमावल्यानंतर आता गाबा कसोटी सामनाही गमवण्याची वेळ आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावांची खेळी केली आहे. दुसरीकडे भारताचे तिसऱ्या दिवशीचा खेळ पाऊस आणि खराब लाईटमुळे थांबवला. त्यामुळे भारताने 4 गडी गमवून 51 धावा केल्या आहेत. अजूनही भारत 394 धावांनी पिछाडीवर आहे. भारताची फलंदाजी पाहता. भारत जास्तीत जास्त 200 धावांपर्यंत मजल मारू शकतो अशी स्थिती आहे. त्यामुळे भारताला कसाही करून चौथा दिवस फलंदाजी करावी लागेल. अन्यथा पाऊस पडला तर हा सामना ड्रॉ होऊ शकतो, असं म्हणण्याची वेळ आली आहे.

तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा केएल राहुल नाबाद 33 आणि रोहित शर्मा नाबाद 0 धावांवर खेळत आहेत. भारताचे आघाडीचे फलंदाज काही खास करू शकले नाही. यशस्वी जयस्वाल 4, शुबमन गिलं 1, विराट कोहली 3 आणि ऋषभ पंत 9 धावा करून बाद झाले आहेत. मिचेल स्टार्कने 2, जोश हेझलवूडने 1 आणि पॅट कमिन्सने 1 गडी बाद केला आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा