AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशचं भारतासमोर विजयासाठी 94 धावांचं आव्हान, जडेजा-अश्विन जोडीची कमाल

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे. दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला असला तरी भारताने चौथ्या दिवशी जबरदस्त कमबॅक केलं. तसेच दुसऱ्या डावात बांगलादेशला 146 धावांवर गुंडाळलं.

बांगलादेशचं भारतासमोर विजयासाठी 94 धावांचं आव्हान, जडेजा-अश्विन जोडीची कमाल
Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 01, 2024 | 12:26 PM
Share

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. दोन दिवस पाऊस पडल्यानंतर सामना ड्रॉ होईल अशीच शक्यता होती. पण टीम इंडियाने जबरदस्त खेळी केली. चौथ्या दिवशी कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 233 धावांवर आटोपला होता. त्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या 34.4 षटकात 285 धावा केल्या आणि 52 धावांची आघाडी घेतली. 9 विकेट गेल्यानंतर भारताने डाव घोषित केला. 52 धावांचा पल्ला गाठतानाच बांगलादेशच्या 3 विकेट गेल्या होत्या. शदमन इस्लामने अर्धशतकी खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज तग धरू शकला नाही. खासकरून आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीपुढे बांगलादेशी फलंदाजांनी नांगी टाकली. बांगलादेशचा संपूर्ण संघ 146 या धावांवर बाद झाला. यातून 52 धावांची भारताची आघाडी वगळता फक्त 94 धावांचं आव्हान मिळालं आहे. हे आव्हान भारतीय सहज गाठेल असं दिसत आहे. त्यामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मदत होईल.

भारताकडून जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर आकाश दीपला एक विकेट मिळाली. बांगलादेशकडून शदमन इस्लामने सर्वाधिक 50 धावा केल्या. त्यानंतर मुशफिकुर रहिमने 37 धावा केल्या. भारताने हा सामना जिंकल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राहणार आहे. तसेच अंतिम फेरीच्या दिशेने प्रवास सुरु होणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.