AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : विराटला आऊट दिल्यावर सामन्यात राडा, रोहितही भडकला, Video पाहून तुम्हीच सांगा चूक कोणाची?

Virat Kohli Not take a DRS : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पण व्हिडीओ पाहून चूक कोणाची हे तुम्हीच सांगा.

IND vs BAN : विराटला आऊट दिल्यावर सामन्यात राडा, रोहितही भडकला, Video पाहून तुम्हीच सांगा चूक कोणाची?
| Updated on: Sep 20, 2024 | 8:14 PM
Share

टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला. टीम इंडियाचा पहिला डाव 376 धावांवर संपला. त्यानंतर बांगलादेशला अवघ्या 149 धावांवर ऑल आऊट करत टीम इंडियाने आघाडी घेतली. टीम इंडिया दुसऱ्यांदा बॅटींगला उतरली असून परत एकदा टॉप ऑर्डर फेल झाली. यामधील विराट कोहलीला आऊट होण्याचा दिलेला निर्णय वादग्रस्त ठरलाय. पण यामध्ये नेमकी चूक कोणाची? व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा.

विराट कोहली पहिल्या कसोटीमध्ये अपयशी ठरला. पहिल्या डावामध्येही अवघ्या 06 धावा काढून तो परतला होता. त्यामुळे दुसऱ्या डावामध्ये त्याच्याकडून सर्वांनाच अपेक्षा होत्या. मात्र पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाने 17 धावांवर त्याला माघारी परतावं लागलं. बांगलादेशचा मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर विराट ऑन साईडला फ्लिप करण्याच्या नादात पायचीत झाला. अंपायर रिचर्ड केटलबोरो यांनी त्याला आऊट दिले. त्यावेळी कोहली आणि शुबमन यांच्यात बोलणं झालं पण रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय दोघांनी घेतला. कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला.

विराट कोहली माघारी गेल्यावर जेव्हा रिव्ह्यूमध्ये पाहण्यात आले तेव्हा सत्य समोर आलं. कोहलीच्या पॅडला चेंडू लागण्याआधी त्याच्या बॅटला लागल्याचं स्पष्टपणे दिसलं. आता रिव्ह्यू घेण्यासाठी शुबमन गिल याने काही कॉल केला नाही. पण बॅटची कट लागली आहे की नाही हे खेळणाऱ्या फलंदाजाला लवकर समजतं. पण जगातील नंबर वन असलेला फलंदाज कोहली हा निर्णय घेण्याआधी गोंधळला आणि त्याने आपली विकेट गमावली. कदाचित कोहलीने वेळीच रिव्ह्यू घेतला असता तर मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरला असता.

पाहा व्हिडीओ:-

दरम्यान, विराट कोहली दिग्गज खेळाडू असून त्याने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टीम इंडियाचा फलंदाजीचा कणा मानलं जातं. कोहलीने आतापर्यंत 114 कसोटी सामन्यांमध्ये 8871 धावा केल्या असून त्यामध्ये 29 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे.

बांगलादेश प्लेइंग 11 : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...