AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, 2nd T20: इंग्लंडने भारताला 4 गडी राखून नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी

भारत इंग्लंड टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यात भारताने 190 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान इंग्लंडने जेकेब बेथेलच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर गाठवलं.

IND vs ENG, 2nd T20: इंग्लंडने भारताला 4 गडी राखून नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी
IND vs ENG, 2nd T20: इंग्लंडने भारताला 4 गडी राखून नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडीImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 04, 2026 | 10:41 PM
Share

भारत आणि इंग्लंड टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आमनेसामने आले होते. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न होता. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 190 धावा केल्या. तसेच विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडन 4 गडी राखून हे आव्हान पूर्ण केलं. यासह पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.  कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात हा तिसरा पराभव आहे.

इंग्लंडचा डाव

भारताने विजयासाठी दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात निराशाजनक झाली. पहिल्या षटकात इंग्लंडला दोन धक्के बसले. फिलिप सॉल्ट आणि जोस बटलर खातं न खोलता बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी हॅरी ब्रूक आणि जेकब बेथेल यांनी 50 धावांची भागीदारी केली. हॅरी ब्रूक 39 धावा करून बाद झाला. त्यानंतर टॉम बँटन आणि जेकब बेथेल यांची भागीदारी जमली. पण 39 धावांवर टॉम बँटन बाद झाला. विल जॅक्सही 9 धावांवर असताना बाद झाला. एका बाजूने जेकब बेथेल विजयासाठी झुंज देत होता. त्याची अर्धशतकी खेळी निर्णायक ठरली. जेकेब बेथेलने रवि बिष्णोईच्या षटकात पुरेपूर लाभ घेतला. नो बॉलनंतर सॅम करनने एक धाव घेतली आणि बेथेलला स्ट्राईक मिळाली. त्यानंतर त्याने बिष्णोईची धुलाई करत त्यात आणखी 27 धावा जोडल्या आणि एका षटकात 29 धावा आल्या. त्यामुळे सामना फिरला.

भारताचा डाव

भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. वैभव 14 दावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्यातील भागीदारी फक्त 15 धावांची झाली अभिषेक शर्मा 43 धावांवर बाद झाला. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांची जोडी जमली. यांनी तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 65 धावा केल्या. श्रेयस अय्यर 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे काही खास करू शकला नाही. फक्त 5 धावा करून परतला. इशान किशनचं अर्धशतक फक्त एका धावेने हुकलं. तर अक्षर पटेल 2 धावांवर असताना धावचीत झाला. हार्षित राणाही 6 धावांवर बाद झाला. तिलक वर्मा नाबाद 24 धावांवर राहिला.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा