AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारताने दुसरा डाव उशिराने घोषित करण्याचं कारण काय? प्रशिक्षकाने सांगितलं खरं काय ते

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने भारताच्या विजयाच्या आशा लांबल्या. पण दुसरा डाव उशिरा घोषित करण्याचं कारण काय? यावर गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मोर्कलने स्पष्टीकरण दिलं आहे.

IND vs ENG : भारताने दुसरा डाव उशिराने घोषित करण्याचं कारण काय? प्रशिक्षकाने सांगितलं खरं काय ते
भारताने दुसरा डाव उशिराने घोषित करण्याचं कारण काय? प्रशिक्षकाने सांगितलं खरं काय तेImage Credit source: Getty Images
Updated on: Jul 06, 2025 | 8:07 PM
Share

भारताची दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड आहे. पहिल्या डावात भारताने 587 धावा केल्या होत्या. पण इंग्लंडने पहिल्या डावात भारताच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. तसेच फॉलोऑनचं संकट टाळलं आणि 407 धावा केल्या. यामुळे भारताचा फॉलोऑनचा प्लान फसला. भारताकडे पहिल्या डावात 180 धावांची मजबूत आघाडी होती. मात्र असं असूनही भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सावध भूमिका घेतली. भारताने दुसऱ्या डावात 6 विकेट गमवून 427 धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताने 180 धावांची बेरीज करत 608 धावांचं मजबूत आव्हान दिलं. पण पाचव्या दिवशी पावसाचा अंदाज असताना भारताने इतक्या उशिराने डाव घोषित करण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. कारण चौथ्या दिवशी चहापानानंतरही भारताने एक तास फलंदाजी केली. त्यामुळे 550 धावांच्या पार असूनही असं का? असा प्रश्न पडलं सहाजिकच आहे. यावर भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कलने स्पष्टीकरण दिलं आहे.

मोर्ने मोर्कलने पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘आम्ही डाव घोषित करण्यासाठी दिवसभर चर्चा केली होती. ही एक चांगली विकेट आहे. आमचे फलंदाज आरामात फलंदाजी करत होते. आमच्या फलंदाजांनी 4 ते 5 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. आपलं निसर्गावर नियंत्रण नसतं. पण आम्ही चांगल्या स्थितीत ठेवू इच्छित होतो. त्यांना 20 ते 25 षटकं फलंदाजी करून काही विकेट हव्या होत्या. त्यात आम्ही यशस्वी झालो. हे आमच्यासाठी बोनस होता.’

भारताने पाचव्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा झटपट दोन विकेट घेतल्या. त्यानंतर टी ब्रेकआधी शेवटच्या चेंडूवर बेन स्टोक्सची विकेट काढली. त्यामुळे आता भारतीय संघ विजयापासून 4 विकेट दूर आहे. आता भारतीय गोलंदाज पुढच्या टप्प्यात कशी गोलंदाजी करतात. याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, जेमी स्मिथ पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही डोकेदुखी ठरत आहे. त्याची विकेट काढणं आता भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान आहे. भारताने हा सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबर फायदा होणार आहे. भारताची विजयी टक्केवारी ही 50 टक्के होईल. तर इंग्लंडला फटका बसेल.

त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या
त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या.
मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल
मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल.
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा.
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री.
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं.
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्.
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?.
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?.
नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या
नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या.
ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं
ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं.