AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : विजयानंतर ध्रुव जुरेलने सांगितली मोठी गोष्ट, कसं शक्य झालं ते सर्वकाही

भारताने इंग्लंडविरुद्धची चौथा कसोटी सामना जिंकला आणि मालिका ३-१ ने खिशात घातली. चौथ्या सामना खऱ्या अर्थाने इंग्लंडचा बाजूने झुकला होता. पण ध्रुव तारा चमकला आणि सामना भारताच्या पारड्यात आला. या विजयानंतर ध्रुवला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यानंतर त्याने बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या.

IND vs ENG : विजयानंतर ध्रुव जुरेलने सांगितली मोठी गोष्ट,  कसं शक्य झालं ते सर्वकाही
IND vs ENG : ध्रुव जुरेल ठरला चौथ्या कसोटीतील विजयाचा शिल्पकार, सामन्यानंतर म्हणाला...
| Updated on: Feb 26, 2024 | 3:36 PM
Share

मुंबई : भारत इंग्लंड चौथा कसोटी सामना रंगतदार झाला. दुसऱ्या दिवसापर्यंत हा सामना इंग्लंडच्या बाजूने झुकलेला होता. इंग्लंडकडे ४६ धावांची आघाडी होती. पण ४६ धावांपर्यंत आघाडी कमी करण्यास महत्त्वाचं योगदान होतं ते ध्रुव जुरेल याचं..कारण पहिल्या डावात इंग्लंडने १० गडी गमवून ३५३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना १६१ धावांवर भारताच्या ५ विकेट गेल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी ध्रुव जुरेल आला. १० धावांची पार्टनरशिप होताच सरफराज खानच्या रुपाने सहावा धक्का बसला. त्यानंतर १७७ धावांवर आर अश्विन तंबूत परतला. त्यामुळे इंग्लंडकडे १६६ धावांची आघाडी होती. पण ध्रुव जुरेल उभा राहिला आणि त्याला कुलदीप यादवची साथ मिळाली. आठव्या गड्यासाठी दोघांनी ७६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आकाशदीपसोबत ४० धावांची भागीदारी केली. त्यामुळे आघाडी कमी होत ४६ धावांवर आली. तर दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडचा डाव १४५ धावांवर आटोपला आणि विजयासाठी १९१ धावांचं आव्हान मिळालं.

दुसऱ्या डावातही ध्रुव जुरेलची फलंदाजी निर्णायक ठरली. संघाची धावसंख्या ८४ असताना यशस्वी जयस्वाल बाद झाला आणि चित्रच पालटलं. १२० धावांवर पाच गडी अशी स्थिती झाली. त्यामुळे आणखी एक विकेट पडली असती तर इंग्लंडला विजय शक्य झाला असता. पण शुबमन गिलला ध्रुव जुरेलची साथ मिळाली. सहाव्या गड्यासाठी दोघांनी विजयी पार्टनरशिप केली. दोघांनी ७२ धावांची भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शुबमन गिलने नाबाद ५२, तर ध्रुव जुरेलने नाबाद ३९ धावांची खेळी केली. ध्रुव जुरेलला या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

“मी परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून खेळत होतो. पहिल्या डावात आम्हाला धावांचा पाठलाग करताना असताना एक गोष्टी लक्षात होतं की दुसऱ्या डावातही फलंदाजी करायची आहे. म्हणून प्रत्येक धाव आमच्यासाठी महत्त्वाची होती. मी काही भागीदारी केल्या त्यामुळे धावांमद्ये त्यांचंही श्रेय आहे. मी फक्त बॉल बघायचो आणि त्या पद्धतीने खेळायचो. त्यासाठी मी काही जास्त विचार केला नाही. दुसऱ्या डावात शुबमन गिलसोबत चांगला संवाद झाला. आम्ही विजयी धावांचा पाठलाग करताना १० धावांचा सेट तयार केला होता आणि त्या पद्धतीने आम्ही फलंदाजी करत होतो.”, असं ध्रुव जुरेल याने सांगितलं.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.