AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षर पटेलला टीम इंडियात मोठी संधी, गौतम गंभीरने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच खेळला डाव

टीम इंडियाची इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अखेर घोषणा करण्यात आली आहे. या संघात मोहम्मद शमीला स्थान मिळालं आहे. दोन वर्षानंतर शमी टी20 फॉर्मेटमध्ये परतला आहे. दुसरीकडे, अक्षर पटेलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. चॅम्पियन्स ट्ऱॉफीपूर्वीच हा डाव खेळला गेला आहे.

अक्षर पटेलला टीम इंडियात मोठी संधी, गौतम गंभीरने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच खेळला डाव
Axar Patel
| Updated on: Jan 11, 2025 | 9:03 PM
Share

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी20 संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. पण उपकर्णधारपदासाठी वेगळं नाव पुढे आल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. संघात हार्दिक पांड्या असताना उपकर्णधारपदासाठी अक्षर पटेलची निवड केली गेली आहे. त्यामुळे क्रीडावर्तुळात चर्चा रंगली आहे. टीम इंडियात नेमकं काय सुरु आहे याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याकडे जबाबदारी येईल असं वाटत होतं. पण सूर्यकुमार यादवला कर्णधार केलं गेलं. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अक्षर पटेलला उपकर्णधार म्हणून जबाबदारी सोपवली आहे. दुसरीकडे, मोहम्मद शमीची या संघात निवड झाली आहे. टी20 संघात मोहम्मद शमीला दोन वर्षांनी संधी मिळाली आहे. तर जवळपास 14 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण करत आहे. त्यामुळे त्याची निवड वनडे मालिकेतही होण्याची दाट शक्यता आहे.

खरं तर टी20 मालिकेनंतर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत जो संघ निवडला जाईल तोच संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असेल यात काही शंका नाही. कारण इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी यासाठी फार काही अंतर नाही. दुसरं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीमची घोषणा करण्याची डेडलाईनही जवळ आहे. त्यामुळे टी20 संघातील काही खेळाडूंना वनडे संघात स्थान मिळेल यात काही शंका नाही. त्यामुळे अक्षर पटेलला दिलेली जबाबदारी पाहता तो वनडे संघातही असू शकतो असं दिसून येत आहे.

22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या आगामी IDFC फर्स्ट बँक पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे. दुसरा सामना 25 जानेवारीला, तिसरा सामना 28 जानेवारीला, चौथा सामना 31 जानेवारीला आणि पाचवा सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारताचा संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी , वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर).

Follow Us
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं.
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.