AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: मुंबई कसोटीत स्पायडर कॅमेरामुळे घडलं असं काही, अखेर पंचांना घ्यावा लागला निर्णय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात दोन्ही संघांना विजयाच्या समान संधी असल्याचं दिसत आहे. कारण पहिल्या डावात भारताकडे फक्त 28 धावांची आघाडी आहे.

IND vs NZ:  मुंबई कसोटीत स्पायडर कॅमेरामुळे घडलं असं काही, अखेर पंचांना घ्यावा लागला निर्णय
| Updated on: Nov 02, 2024 | 3:26 PM
Share

न्यूझीलंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांची विजयासाठी धडपड आहे. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 235 धावा केल्या. त्या बदल्यात भारताने सर्व गडी बाद 263 धावा केल्या आणि फक्त 28 धावांची आघाडी घेतली. अशी सर्व स्थिती सामन्यांच्या दुसऱ्या दिवशी असताना एक वेगळात अडसर या सामन्यात पाहायला मिळाला. क्रिकेट सामन्यात सर्वात कॅमेरा सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. वेगवेगळ्या अँगलने चित्रीकरण केलं जातं. त्यामुळे पंचांना काही निर्णय घेणं सोपं जातं. पण हाच कॅमेरा मुंबई कसोटीत त्रासदायक ठरला. त्यामुळे पंचांना लंच ब्रेकपूर्वी नाईलाजास्तव एक निर्णय घ्यावा लागला

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्र संपण्यापूर्वी स्पायडर कॅमेऱ्यात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे स्पायडर कॅमेरा खाली आल्यानंतर वर काही जाण्याचं नाव घेत नव्हता. त्यामुळे पंचांनी वेळेआधीच लंच ब्रेकचा निर्णय घेतला. यानंतर रवींद्र जडेजाने पहिलं सत्र संपण्याची घोषणा केल्यानंतर पंचांशी चर्चा केली.पण कॅमेऱ्याचा तांत्रिक बिघाड पाहाता त्याने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि मैदानातून बाहेर जाऊ लागले. नेमकं तेव्हाच कॅमेऱ्यात हालचाल झाली. पण खेळाडू मैदानाबाहेर जाण्याच्या वेशीवर पोहोचले होते. त्यामुळे लंच ब्रेक लवकर घ्यावा लागला. तसेच दुसऱ्या सत्राचा खेळ लवकर सुरु करावा लागला.

भारताकडून शुबमन गिल, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगली खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मा फक्त 18 धावा करून बाद झाला. तर विराट कोहली अवघ्या 4 धावांवर बाद झाला. सरफराज खान आणि मोहम्मद सिराजला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे शुबमन गिल आणि ऋषभ पंतच्या खेळीने भारताचा डाव सावरला गेला. अन्यथा तिसऱ्या कसोटीतही कठीण होतं. एजाज पटेलने सर्वाधिक 5 विकेट घेतले.

Follow Us
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्.....
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्......
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली..
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली...