IND vs SA: कार्तिकच्या आधी अक्षर पटेलला का पाठवलं? ऋषभची ही कसली कॅप्टनशिप? प्रश्न विचारताच अजब उत्तर

टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज सुरु आहे. काल सलग दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाला. दिल्ली आणि कटक दोन्ही सामन्यात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे.

IND vs SA: कार्तिकच्या आधी अक्षर पटेलला का पाठवलं? ऋषभची ही कसली कॅप्टनशिप? प्रश्न विचारताच अजब उत्तर
Team India Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 1:34 PM

मुंबई: टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज सुरु आहे. काल सलग दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाला. दिल्ली आणि कटक दोन्ही सामन्यात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. ऋषभ प्रथमच कॅप्टनच्या रोलमध्ये आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात फलंदाजीत क्रमावारीत एक वेगळाच चक्रावून टाकणारा बदल पहायला मिळाला. कटक येथे झालेल्या टी 20 मॅचमध्ये भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी फिनिशर दिनेश कार्तिकऐवजी (Dinesh karthik) ऑलराऊंडर अक्षर पटेलला (Axar Patel) फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. क्रिकेटच्या जाणकारांना या निर्णयाच आश्चर्य वाटलं. कारण त्यावेळी टीम इंडियाचा स्कोर कमी होता. दिनेश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, मग अशावेळी त्याला का रोखण्यात आलं. अक्षर पटेलने या सामन्यात 11 चेंडूत 10 धावा केल्या. त्याच्यानंतर फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकने वेगाने फटकेबाजी करुन टीमला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. दिनेश कार्तिकने 21 चेंडूत 30 धावा केल्या. यात दोन चौकार आणि दोन षटकार होते.

तो सतत स्ट्राइक रोटेट करतो

ऋषभ पंतच्या या निर्णयावर जेव्हा प्रश्न निर्माण करण्यात आला, त्यावेळी टीम इंडियाकडून उत्तरही आलं. मॅच नंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये श्रेयस अय्यर म्हणाला की, “याबद्दल आम्ही आधी प्लानिंग केली होती. अक्षर पटेल फलंदाजीला आला, त्यावेळी सात ओव्हर्स बाकी होत्या. अक्षर पटेल असा खेळाडू आहे, जो सतत स्ट्राइक रोटेट करतो”

दिनेश कार्तिक अशी फलंदाजी करण्यात सक्षम

“ती वेळ अशी नव्हती की, तुम्ही जाऊन थेट पहिल्या चेंडूपासून फटेकबाजी कराल. दिनेश कार्तिक अशी फलंदाजी करण्यात सक्षम आहे. तो 15 ओव्हर्सनंतर टीम इंडियासाठी गरजेचा आहे. त्यावेळी कार्तिकला हिटिंगची संधी मिळते. फलंदाजीसाठी विकेट सोपी नव्हती, त्यामुळे दिनेश कार्तिकला सुद्धा सुरुवातीला अडचणी आल्या” असं श्रेयस अय्यर म्हणाला.

हे सुद्धा वाचा

श्रेयस अय्यरच्या 40 धावा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 148 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 40 रन्स केल्या. पण टीम इंडियाचा या मॅचमध्ये पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.