AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान भिडणार? कसं काय ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचे वेध लागले आहेत. त्यामुळे कोणत्या गटात कोणता संघ असेल याची उत्सुकता आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत पाकिस्तान यांच्यात सामना होणार की नाही? याबाबत जाणून घ्या.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान भिडणार? कसं काय ते समजून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान भिडणार? कसं काय ते समजून घ्याImage Credit source: ACC
| Updated on: Oct 16, 2025 | 8:18 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे या दोन देशात ही स्पर्धा होणार आहे. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार यात काही शंका नाही. पण या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार का? कारण हे दोन संघ फक्त आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत एकमेकांशी खेळतात. या दोन संघात द्विपक्षीय मालिका होतच नाही. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याने भारताने 2012पासून पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिला आहे. त्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आणखी कठोर धोरण अवलंबलं आहे. आशिया कप स्पर्धेत तर हस्तांदोलनही केलं नाही.  पण सामना खेळत तीन वेळा पराभवाची धूळ चारली. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सामना होणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. 2024 वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकातून याबाबत समजून घेऊयात.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान असेल असं सांगण्यात येत आहे. मागच्या पर्वात 20 संघांचं वर्गीकरण चार गटात करण्यात आलं होतं. अ, ब, क, ड असे गट असतील आणि प्रत्येक गटात पाच संघ खेळतील. यंदाही तसंच असेल यात काही शंका नाही. भारत आणि पाकिस्तान मागच्या पर्वात एकाच गटात होते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान सामन्याची पर्वणी क्रीडाप्रेमींना अनुभवता आली होती. पण यावेळी हे दोन संघ एकाच गटात असतील की नाही याबाबत शंका आहे. जर हे दोन संघ साखळी फेरीत एकाच गटात नसतील तर या फेरीत सामना होणार नाही. मग सुपर 8 फेरीत सामना होण्याची शक्यता आहे. कसं काय ते पुढे समजून घ्या.

साखळी फेरीतील प्रत्येक गटातील टॉप 2 संघ सुपर 8 फेरीत जागा मिळवतील. जर भारत आणि पाकिस्तानने सुपर 8 फेरीत जागा मिळवली तर या ठिकाणी सामना होण्याची शक्यता आहे. पण येथेही एक अडसर आहे. अ आणि ब गटातील टॉपचे दोन संघ ग्रुप 1 मध्ये, क आणि ड गटातील दुसर्‍या क्रमांकाचे संघ ग्रुप 1 खेळतील. तर अ आणि ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचे संघ ग्रुप 2 आणि क आणि ड गटातील टॉप संघ ग्रुप 2 मध्ये खेळतील. त्यामुळे या समीकरणात दोन्ही संघ बसले तर सुपर 8 फेरीत आमनासामना होऊ शकतो. पण येथेही तसं झालं नाही तर उपांत्य फेरीत सामना होऊ शकतो. तसंही झालं नाही तर अंतिम फेरीत भिडू शकतात. पण यातलं एकही समीकरण बिघडलं तर हे दोन संघ भिडणार नाही. भारत पाकिस्तान आमनेसामने आले तर हा सामना श्रीलंकेत होईल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.