AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा बांगलादेशला व्हाईटवॉश, दुसऱ्या कसोटीत 7 विकेटने नमवलं

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली. पहिल्या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला होता. पण दुसऱ्या सामन्यात विजय मिळेल की नाही याबाबत शंका होती. कारण दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला होता.

टीम इंडियाचा बांगलादेशला व्हाईटवॉश, दुसऱ्या कसोटीत 7 विकेटने नमवलं
Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 01, 2024 | 1:58 PM
Share

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. भारताने अपेक्षेप्रमाणे बांगलादेशला दोन्ही सामन्यात पराभवाची धूळ चारली. यासह मालिका 2-0 ने खिशात घातली, तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. खरं तर दुसरा कसोटी सामना ड्रॉ होईल अशीच स्थिती होती. कारण पहिल्या दिवशी फक्त 35 षटकांचा खेळ झाला. बांगलादेशच्या 3 गडी बाद 107 धावा होत्या. त्यानंतर दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशी काय होणार अशी स्थिती होती. पण भारताने चौथ्या दिवशी कमाल केली. खासकरून भारतीय गोलंदाजांनी कमबॅक करून दिली. बांगलादेशचा संपूर्ण संघ 233 धावांवर बाद केला. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशीच धडाकेबाज फलंदाजी केली. जो येईल तो बांगलादेशी गोलंदाजांना ठोकून काढत होता. चौथ्या दिवशी 9 गडी बाद 285 धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताकडे 52 धावांची आघाडी होती. ही आघाडी मोडून काढताना बांगलादेशने तीन गडी गमवले होते. त्यानंतर शदमान इस्लामने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण अर्धशतक झाल्यानंतर आकाश दीपने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तसेच जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

बांगलादेशने दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 146 धावा केल्या आणि विजयासाठी 94 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान 3 गडी गमवून पूर्ण केलं. रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करून देण्यासाठी प्रयत्न केला. त्याने एका चौकाराच्या मदतीने 7 चेंडूत 8 धावा केल्या. पण मेहिदी हसनच्या गोलंदाजीवर हसन महमूदने त्याचा झेल घेतला आणि बाद केलं. शुबमन गिल 10 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी मोर्चा सांभाळला.

बांगलादेशविरुद्धचे दोन्ही सामने सहज जिंकल्याने भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेसाठी फायदा झाला आहे.बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्याने भारताची विजयी टक्केवारी 74.24 इतकी झाली आहे. भारतीय संघाला आता आणखी 8 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी तीन कसोटी सामने न्यूझीलंडविरुद्ध भारतात खेळायचे आहेत. तर पाच कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.