AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप आधी भारतीय संघ आणखी एका देशाविरुद्ध वनडे सीरीज खेळणार, 6 वर्षानंतर होणार मालिका

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी भारतीय संघाच अत्यंत व्यस्त वेळापत्रक आहे.

आशिया कप आधी भारतीय संघ आणखी एका देशाविरुद्ध वनडे सीरीज खेळणार, 6 वर्षानंतर होणार मालिका
| Updated on: Jul 09, 2022 | 7:04 AM
Share

मुंबई: ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी भारतीय संघाच अत्यंत व्यस्त वेळापत्रक आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंड मध्ये टी 20 मालिका खेळतोय. त्यानंतर वनडे सीरीज (Odi Series) आहे. इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होईल. त्यानंतर श्रीलंकेत आशिया कप स्पर्धा आहे. एकूणच पुढच्या तीन महिन्यातला भारतीय संघाचा कार्यक्रम अत्यंत व्यस्त आहे. त्यातही भारतीय संघ पुढच्या महिन्यात झिम्बाब्वे विरुद्ध (zimbabwe Tour) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यासाठी अधिकृतपणे तारखांची घोषणा होणं, अजून बाकी आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, हे सामने आयसीसीच्या एकदिवसीय सुपर लीगचा हिस्सा असतील. 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हे सामने खेळले जातील.

झिम्बाब्वे विरुद्ध सीरीज महत्त्वाची कारण…

झिम्बाब्वे विरुद्धची ही मालिका महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण याचे पॉइंटस पुढच्यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या क्वालिफिकेशनसाठी विचारात घेतले जातील. “भारतीय संघ इथे खेळायला येणार, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. एक संस्मरणीय मालिका होईल, अशी अपेक्षा आहे” असं झिम्बाब्वे क्रिकेटच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

आमच्यासाठी ही एक चांगली संधी

“आमच्या खेळाडूंसाठी ही एक मोठी संधी आहे. त्यांना टीम इंडियाच्या दिग्गज आणि मोठ्या खेळाडूंविरोधात खेळण्याची संधी मिळणार आहे. यामुळे देशातील युवा खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी अधिकाधिक प्रेरणा मिळेल, आमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे” असं या अधिकाऱ्याने सांगितलं.

किती वर्षानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार?

भारतीय संघ सहावर्षानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी 2016 साली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता, त्यावेळी तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका झाली होती. यावेळी भारतीय संघ फक्त वनडे सीरीज खेळणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.