AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटच्या स्वप्नातील ‘नवा भारत’, 6 वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं, मेहनत घेतली, आज ते पूर्ण झालं!

कसोटी क्रिकेटमध्ये भारताला हे स्थान काही सहज मिळालं नाहीय. त्यासाठी भारतीय संघाला अपार मेहनत घ्यावी लागली आहे. आज भारताचा जगात बोलबाला आहे, तो एका दिवसांत झालेला नाही. विराट कोहलीला याचं मोठं श्रेय जातं. (India Topped ICC Top Ranking Virat Kohli Dreams Comes True)

विराटच्या स्वप्नातील 'नवा भारत', 6 वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं, मेहनत घेतली, आज ते पूर्ण झालं!
त्यानंतर दुसरे दुहेरी शतक कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधून निघाले. कोहलीने देखील नाबाद 254 धावा केल्या होत्या. पुण्यात त्याने ही अप्रतिम खेळी केली होती.
| Updated on: May 14, 2021 | 6:40 AM
Share

मुंबई : आयसीसीने नुकतेच टेस्ट रॅकिंग(Icc Test Ranking) जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाने (Team India) आपला थाट कायम राखलाय. विराट सेनेने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलंय. विशेष म्हणजे विराटसेनेने गेल्या 5 वर्षांपासून अव्वल स्थान कायम राखलं आहे. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली. टीम इंडियाने इंग्लंडला (England) कसोटीत धूळ चारली. तर ऑस्ट्रेलियाला (Australia) त्यांच्याच भूमीत चारी मुंड्या चीत केलं. टीम इंडियाने इंग्लंडचा 3-1 तर ऑस्ट्रेलियाला 2-1 च्या फरकाने पराभूत केलं होतं. या कामगिरीचा फायदा टीम इंडियाला क्रमवारीत झाला आहे. याचसोबत विराट कोहलीने 6 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज ते साकार झालंय. (India Topped ICC Top Ranking Virat Kohli Dreams Comes True)

विराटचं स्वप्न साकार

कसोटी क्रिकेटमध्ये भारताला हे स्थान काही सहज मिळालं नाहीय. त्यासाठी भारतीय संघाला अपार मेहनत घ्यावी लागली आहे, रात्रीचा दिवस करावा लागला आहे. आज भारताचा जगात बोलबाला आहे, तो एका दिवसांत झालेला नाही. अनेक दिग्गजांना त्यांच्यात भूमीत जाऊन त्यांना आस्मान दाखावण्याची अद्वितीय कामगिरी टीम इंडियाने करुन दाखवली आहे. आज ताकदीचे संघ भारतीय संघासोबत खेळण्यास कचरतात. विराटच्या स्वप्नातील नवा भारत, जे स्वप्न त्याने 6 वर्षांपूर्वी पाहिलं होतं की कमीत कमी 5 वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये भारत जगावर राज करेल… आज त्याचं स्वप्न साकार झालंय.

विराटचं स्वप्न सत्यात उतरलं!

भारताने या वर्षी आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं आणि विराटचं स्वप्न साकार झालं. भारताने पाठीमागील सलग पाच वर्ष जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलंय. भारताने 2017, 2018, 2019, 2020 आणि आता 2021 असे सलग पाच वर्ष सगळ्यांना धूळ चारत कसोटी अव्वल स्थान मिळवलंय.

टीम इंडिया अव्वलस्थानी

टीम इंडिया 121 रेटिंग्स पॉइंट्ससह पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी राहिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडची टीम आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये अवघ्या 1 रेटिंग पॉइंटचा फरक आहे. न्यूझीलंडच्या नावे 120 पॉइंट्स आहेत. न्यूझीलंडने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव केला होता.

इंग्लंडची झेप तर ऑस्ट्रेलियाची घसरण

या क्रमवारीत इंग्लंडला एका स्थानाचा फायदा तर ऑस्ट्रेलियाची घसरण झाली आहे. इंग्लंडने चौथ्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. इंग्लंडच्या नावे 109 तर ऑस्ट्रेलियाकडे 108 पॉइंट्स आहेत. तर पाकिस्तान 5 व्या स्थानी कायम आहे.

(India Topped ICC Top Ranking Virat Kohli Dreams Comes True)

हे ही वाचा :

ICC Test Ranking | टीम इंडियाची सलग 5 वर्ष बादशाहत कायम, आयसीसीच्या वार्षिक क्रमवारीत विराट सेना अव्वलस्थानी

Ramesh Powar | दिग्गजांना पछाडत रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.