AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी, टीम इंडियाच्या वाटेला दोन कसोटीत आलं असं काही

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पण कोणत्या संघाचं वजन अधिक आहे ते जाणून घेऊयात

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी, टीम इंडियाच्या वाटेला दोन कसोटीत आलं असं काही
| Updated on: Sep 18, 2024 | 7:44 PM
Share

कसोटी मालिकेसाठी भारत आणि बांग्लादेश हे दोन आशियाई संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारतीय संघ सहा महिन्यानंतर कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. कारण या मालिकेतील विजय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित सोडवणार आहे. पराभव आणि ड्रॉ सामना विजयी टक्केवारीवर परिणाम करणार आहे.भारत आणि बांग्लादेश हे दोन संघ कसोटी क्रिकेटमध्ये 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताचं वजन अधिक आहे. भारताने 11 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामने ड्रॉ झाले आहेत. या दोन सामन्यात बांगलादेशने भारताला चांगलंच झुंजवल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे बांगलादेशला कमी लेखनं महागात पडू शकतं. भारत आणि बांग्लादेश यांच्यात मायदेशात आतापर्यंत एक कसोटी मालिका पार पडली आहे. तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकली होती. ही मालिका 2017 साली भारतात पार पडली होती. त्यानंतर भारत बांग्लादेश कसोटी सामना भारतात झालेला नाही.

मागच्या दोन कसोटी सामन्यांचा विचार केला तर बांगलादेशला खूप वाईट पद्धतीने टीम इंडियाने पराभूत केलं आहे. दोन्ही सामने भारताने एका डावाने जिंकले आहेत. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील मागील पाच सामन्यांचं विश्लेषण जाणून घ्या

  • फेब्रुवारी 9-13, 2017 मध्ये सामना पार पडला. भारत (687/6 डाव घोषित आणि 159/4 डाव घोषित) बांगलादेश (388 आणि 250). भारताने 208 धावांनी पराभव केला.
  • नोव्हेंबर 14-16, 2019 मध्ये सामना पार पडला. भारत (493/6 डाव घोषित) बांग्लादेश (150 आणि 213) भारताने एक डाव आणि 130 धावांनी पराभव केला.
  • नोव्हेंबर 22-24, 2019 मध्ये सामना पार पडला. भारत (347/9 डाव घोषित) बांगलादेश(106 आणि 195. भारताने एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला.
  • डिसेंबर 14-18, 2022 मध्ये सामना पार पडला. भारत (404 आणि 258/2 डाव घोषित) बांगलादेश (150 आणि 324). बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला.
  • डिसेंबर 22-26, 2022 सामना पार पडला. भारत (314 आणि 145/7) बांगलादेश (227 आणि 231). बांगलादेशचा3 गडी राखून पराभव केला.

पहिला कसोटी सामना 1934 मध्ये चेन्नईत झाला होता. तेव्हापासून चेन्नईमध्ये एकूण 34 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 15 कसोटी सामने जिंकले आणि 11 सामने अनिर्णित राहिले. उर्वरित 7 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.