AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीने कसोटीत गाठला 9 हजार धावांचा पल्ला, अशी कामगिरी करणारा चौथा फलंदाज

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात विराट कोहलीला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. पण दुसऱ्या डावात विराट कोहलीने साजेशी खेळी करत अर्धशतक ठोकलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली 102 चेंडूत 70 धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने एका विक्रमाला गवसणी घातली.

विराट कोहलीने कसोटीत गाठला 9 हजार धावांचा पल्ला, अशी कामगिरी करणारा चौथा फलंदाज
Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 18, 2024 | 5:37 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना बंगळुरुत सुरु आहे. या सामन्यातील तीन दिवसांचा खेळ संपला असून अजून दोन दिवस शिल्लक आहे. या सामन्यावर तसं पाहिलं तर न्यूझीलंडची पकड मजबूत आहे. पण भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या दिवशी चांगली खेळी केली. त्यामुळे चौथ्या दिवसावर भारताचं पुढचं गणित ठरणार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि फसगत झाली. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडने जबरदस्त खेळी करत भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं. न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्व गडी बाद 402 धावा केल्या. न्यूझीलंडकडे 356 धावांची मजबूत आघाडी होती. यासाठी भारताच्या सलामीच्या यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा या जोडीने चांगली सुरुवात केली. त्यानंतर विराट कोहली आणि सरफराज खान यांची जोडी जमली. या जोडीने 136 धावांची खेळी केली. विराट कोहलीने 70 धावा केल्या आणि दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट टाकली. तर सरफराज खान नाबाद 70 धावांवर खेळत आहे. भारताने 3 गडी गमवून 231 धावा केल्या आहेत. अजूनही न्यूझीलंडकडे 125 धावांची आघाडी आहे. असं असताना विराट कोहलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

विराट कोहलीने कसोटीत 9 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. विराट कोहलीने 197 कसोटी डावात 9 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर असा कारनामा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत विराट कोहली आघाडीवर आहे. कारण त्याने हा पल्ला गाठण्यासाठी 176 डाव घेतले. तर सचिनने 179 डावात ही किमया साधली. सुनील गावस्कर यांना 192 डाव लागले. विराट कोहलीने 9 हजारांचा पल्ला 197 डावात पूर्ण केला.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 2042 धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंडविरुद्ध 1991 धावा आहेत. त्याचबरोबर दक्षिण अफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान कसोटीत सर्वात कमी डावात 9 हजार धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्याने 172 डावात ही किमया साधली आहे. स्टीव्ह स्मिथने 174 डावात, तर राहुल द्रविड आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, विराट कोहली आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या स्थानी 15 हजार धावा करणारा पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी हा कारनामा पॉन्टिंग, संगकारा आणि केन विल्यमसनच्या नावावर आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...